100 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी करावी; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

100 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी करावी; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन


LOKSANDESH  NEWS 


100 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी करावी; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन 

   यावर्षी मे महिन्यामध्येच राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली असून जून महिन्यामध्ये येणाऱ्या पावसामुळे नदी नाले दूथडी भरुन वाहतात, पण यावर्षी मात्र मे महिन्यामध्येच राज्यात काही ठिकाणी नदी नाले वाहु लागले आहेत. शेतात पाणी साचले घरात पाणी शिरले अशा घटना अनुभवास आल्या. मे महिन्यामध्ये सुरू असलेल्या मान्सून पूर्व पावसामुळे शेतकऱ्यांनी शेतात पेरणी करायला लागले तर काही द्विदा मनस्थितीत सापडले आहेत. 

   आपल्या शेतात परिसरात 100 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी शेतात पेरणी करावी तसेच शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्डचा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड काढलं नसेल त्यांनी किसान क्रेडिट कार्ड काढून घ्यावे, शेतात पेरणी करताना आंतरपीक देखील घ्यावे, त्याचबरोबर शेतकऱ्यांनी बियाणे, खत, रासायनिक औषधी जेवढ लागत असेल तेवढेच घ्यावे, अतिरिक्त खतांचा वापर टाळावा असे आवाहन जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शेतकऱ्यांना केले आहे. 




लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.