प्राचीन काळात म्हणत होते ते... कली युग हेच असावे.... एका प्रियकरासाठी दोघींची मारामारी, भररस्त्यात एकमेकींच्या झिंज्या उपटल्या....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

प्राचीन काळात म्हणत होते ते... कली युग हेच असावे.... एका प्रियकरासाठी दोघींची मारामारी, भररस्त्यात एकमेकींच्या झिंज्या उपटल्या....



UTTRAKHAND....

प्राचीन काळात म्हणत होते ते कली युग हेच असावे....
एका प्रियकरासाठी दोघींची मारामारी, भररस्त्यात एकमेकींच्या झिंज्या उपटल्या....


सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात तर... काही थरारक असतात... काही अचंबित करणारे तर काही थक्क करणारे असतात.....सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे ....


व्हिडीओ पाहून तुम्हीही अचंबित व्हाल. ....या व्हिडीओत चक्क दोन तरुणी एकमेकांना मारहाण करताना दिसत आहे. . सध्या या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला.


प्रेमासाठी माणूस काहीही करतो विशेषत: मुलं मुलीसाठी काहीही करू इच्छीतात.... मात्र या व्हिडिओमध्ये या दोन तरुणी एका मुलासाठी भांडत आहे. आणी हो, या तरुणी चक्क बॉयफ्रेंडसाठी भांडत आहेत. या तरुणी भररस्त्यात बॉयफ्रेंडसाठी वाद घालताना दिसत आहे. एवढचं काय तर त्या दोघी एकमेकांच्या झिंज्या उपटतात.


 काठीने एकमेकींना मारझोड पण करतात. विशेष म्हणजे या दोघींचा स्वत:चा ग्रुप होता आणि या ग्रुपमध्ये या तरुणी भांडताना आणि मारझोड करताना व्हिडिओमध्ये दिसत आहे.


यामध्ये आसपासचे लोक नेहमीप्रमाणे त्यांना बाहेरून प्रोत्साहन देत होते... काही याचा आनंद.. भांडणाचा मजा घेत होते... व काही जण शूटिंग करत होते... काही लोकांनी या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.....


ही घटना उत्तराखंडच्या हल्द्वानीतील हिरानगरच्या पोलीस योगा पार्कातील आहे. या संदर्भात @askbhupi ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट माहिती दिली. सध्या या व्हिडिओवर अनेक मजेशीर प्रतिक्रिया नेटीझन्स पोस्ट करत आहेत ....          
                       परंतू....


परंतु यातील मजेचा व गमतीचा भाग सोडल्यास्... यातून पालकांनी एकच बोध घ्यावा की ...आपण ज्या  दिवट्याला किंवा  दिवटीला ...उच्च शिक्षणासाठी ...मोठे मोठे खर्च करून चांगल्या कॉलेजमध्ये बाहेरगावी
प्रवेश घेतला आहे...   ती आपली दिवटी काय दिवे लावत आहेत.. काय काय करतात... याचा थांग पत्ता पालकांना लागत नाही....
बाहेर जाऊन काय ..करत असतात याच मोजण्याचे कोणतेही माप पालकाच्या हातात नाही ....त्यामुळे काही मुलं वाह्यातपणे आपल्या आई-वडिलांच्या पैशाची उधळण करत...  अक्षरशः चैनी करत ...व्यसनाधीन होत आहेत ... आपल्या आई-वडिलांनी ज्या उद्देशाने आपल्याला पाठवले आहे... तो उद्देश बाजूला ठेवून कांहीं विद्यार्थी असे  वागत असतात .... परंतु या मधून भविष्यात पालकांच्या पदरात फक्त दुःखच पडणार आहे  ..याला इलाज राहिलेला नाही.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई