LOKSANDESH NEWS
सलग दुसऱ्या दिवशी पहाटेपासून रत्नागिरीत अवकाळी पावसाला सुरुवात
हवामान खात्याच्या इशारा नंतर सलग दुसऱ्या दिवशी पहाटेपासून रत्नागिरीत अवकाळी पावसाला सुरुवात झाली. समुद्रातील वातावरणीय बदलामुळे रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्याचा हाय अलर्ट चा इशारा देण्यात आला आहे.
सागरी किनारपट्टी भागातही अवकाळी पावसाने जोरदार बॅटिंग केली. पहाटेपासून पडलेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागामध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी वीज खंडित झाली आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली