SANGLI :बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय हे ग्रामीण भागाला संजीवनी ठरेल :सचिव प्राचार्य डॉ. यू. एम. मस्के

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SANGLI :बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय हे ग्रामीण भागाला संजीवनी ठरेल :सचिव प्राचार्य डॉ. यू. एम. मस्के




SANGLI
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी


बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय हे ग्रामीण भागाला संजीवनी ठरेल :सचिव प्राचार्य डॉ. यू. एम. मस्के

पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे लॉ कॉलेज लवकरच सुरु करणार 




तासगाव :  बलगवडे (ता. तासगाव) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय ग्रामीण भागाला संजीवनी ठरेल, असे मत पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबईचे सहसचिव प्राचार्य डॉ. यू. एम. मस्के यांनी व्यक्त केले. ते तासगाव तालुक्यातील बलगवडे या गावात भारतीय संविधानाचे शिल्पकार ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ या शैक्षणिक संस्थेच्या नियोजित ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेजचे नामफलक अनावरण समारंभात बोलत होते.



       यावेळी संस्थेचे कार्यकारी समिती संचालक चंद्रशेखर कांबळे,  स्थानिक कार्यकारी समिती संचालक संदेश भंडारे, बलगवडे गावचे सुपुत्र तथा दैनिक ‘दोपहर दो बजे’ आणि ‘इंडिया ग्राउंड रिपोर्ट वेबपोर्टल’चे कार्यकारी संपादक व मुंबई मंत्रालयातील पत्रकार राजा आदाटे, सरपंच जयश्री पाटील, सामाजिक कार्यकर्ते राहुल थोरात, शिक्षणतज्ञ जयवंत माळी, गावचे नेते अनिल पाटील आदी उपस्थित होते.



         याप्रसंगी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव प्राचार्य डॉ. यू. एम. मस्के यांच्याहस्ते विधी महाविद्यालयाच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर गावच्या सरपंच जयश्री पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने कॉलेजसाठी लागणारा ग्रामसभेचा ठराव आणि जागेची कागदपत्रे संस्थेचे सह सचिव प्राचार्य मस्के यांच्याकडे सुपूर्त केली.



यानंतर प्राचार्य डॉ. यू. एम. मस्के पुढे म्हणाले की, केंद्रीयमंत्री तथा पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन ना. रामदास आठवले यांचे जन्मभूमी सांगली जिल्ह्यात एक सुसज्ज महाविद्यालय सुरु करायचे स्वप्न आहे. त्यासाठी केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी या महाविद्यालयासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. या कॉलेजसाठी, जागेसाठी लागणाऱ्या सर्व प्रशासकीय परवानग्या लवकरात लवकर मिळवून पुढील वर्षभरात महाविद्यालय सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे. लवकरच याठिकाणी सर्वसोयीनियुक्त अद्यावत विधी महाविद्यालय त्याचबरोबर मुंबई, दिल्लीच्या धर्तीवर एम. पी. एस. सी., यू. पी. एस. सी. ट्रेनिंग सेंटर, मुला-मुलींचे वसतिगृह अशा सुविधा उपलब्ध होतील.



संस्थेचे सचिव यू. एम. म्हस्के पुढे म्हणाले की, ना. रामदास आठवले यांचे आपल्या भागातील गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना वकील बनविण्याचे, त्यांच्या हाताला काम देऊन त्यांना समृद्ध करणाऱ्याचे स्वप्न साकार होत असून, तासगाव तालुक्यातील बलगवडेकरांनी दिलेले योगदान गावाला जगाच्या नकाशावर नेईल.

संस्थेचे संचालक चंद्रशेखर कांबळे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा तळागाळात रुजविण्यासाठी संस्था कार्यरत आहे. या जिल्ह्याचे सुपुत्र ना. रामदास आठवले हे केंद्रात मंत्री असून, त्यांच्या माध्यमातून विकासाची गंगोत्री तासगावच्या ग्रामीण भागात यावी हा प्रामाणिक प्रयत्न आहे.



संस्थेचे स्थानिक कार्यकारी समिती संचालक संदेश भंडारे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षण संस्थेचे विधी महाविद्यालय बलगवडे गावात सुरू होणार आहे ही गावासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. या कॉलेजसाठी लागणारे सर्व सहकार्य करायला संपूर्ण ग्रामस्थ तयार आहेत. या कॉलेजमुळे गावातील उद्योगधंदे, रोजगारनिर्मिती होण्यास मदत होईल, केंद्रीय मंत्री तथा संस्थेचे चेअरमन ना. आठवले साहेबांच्या विशेष प्रयत्नांना यश आले असून तालुक्यासह या भागाचा कायापालट होईल 
यावेळी अनिल पाटील, विलासराव पाटील, आर. पी. खराडे, धनाजी शिंदे, शुभम पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल थोरात यांनी केले, तर प्रास्ताविक राजा आदाटे, आभार अनिल पाटील यांनी मांडले. कार्यक्रमास पोलीस पाटील रघुनाथ पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष निवास पाटील, उपसरपंच श्रीकांत मोहिते, ग्रामसेवक विजय पाटील, उध्दव शिंदे, कॅप्टन बजरंग पाटील, सतीश पाटील, धनाजी शिंदे, सुनील माळी, मधुकर शिंदे, सरदार मुलाणी, सूर्यकांत थोरात, दिलीप थोरात, संजय रास्ते, शहाजी पाटील, सचिन पाटील, प्रशांत पाटील, बंडू पाटील आदी उपस्थित होते.


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली