...आला आला (सरकारी) कोरोना आला.... जपून राहा रे .. बाबांनो ....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

...आला आला (सरकारी) कोरोना आला.... जपून राहा रे .. बाबांनो ....



आला आला (सरकारी )
कोरोना आला.... जपून राहा रे .. बाबांनो ....

नेहमीच येतो पावसाळा... म्हणल्यासारखे राजकारण्यांच्या मनात आल्या नंतर कोरोनाने आणखी परत आपलं डोकं वर काढलेल आहे..

W.H.O. संघटनेने आम्ही जगाला किती मूर्ख बनवू शकतो याचा एक जागतिक पातळीवर प्रयोग केला आणि तो यशस्वी झाला...


या मधून सर्व राजकर्त्यांना, संबंधित अधिकाऱ्यांना, मंत्र्यांना व डॉक्टरांना आणि त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व पिल्लावळ्यांना याचा नक्की फायदा झाला..

कोरोना... लोकांच्या मनात धास्ती निर्माण करून प्रत्यक्ष लुटमार करण्याचा एक वेगळा फंडा.....

बघा. . आता चायना मध्ये किती कोटी लोक कोरोनामध्ये मरत आहेत किंवा बाधित आहेत त्याच्यावर पद्धतशीरपणे पहिल्यांदा भारतीय नागरिकांवर ही गोदी मीडिया या बातम्या चालवतील , प्रसार माध्यमातून प्रसार करेल आणि तो चालू आहे...
(आणि चायनाला जाऊन कोणीही पाहिलेले नसते आणि चायना मधून कधीही त्या देशाच्या बातम्या बाहेर पडत नाहीत)



त्यानंतर भारतातील मीडिया व ज्याना पत्रकारितेची अक्कल नाही जी फक्त पैशासाठीच काम करतात..अशी मोठ मोठी वर्तमानपत्रे सुद्धा या कोरोनावर मोठ्या मोठ्या बातम्या फ्रंट पेजवर लावून नागरिकांच्या मनात आत्मिक भीती निर्माण करण्याचे काम करतील....

(म्हणजे एक खोटी गोष्ट सतत दहा पंधरा वेळा सांगितली गेली तर ती गोष्ट खरी वाटायला सुरुवात होते)

कोणत्याही मोठ्या बातमीला जेवढं प्राधान्य देणार नाहीत.... त्याच्यापेक्षा जास्त प्राधान्य ही मोठे मोठी गोदी मीडिया करतील.... याचं कारण असं आहे की,डॉक्टर संघटना कडून या मीडियाला व वर्तमानपत्रांना मोठ्या प्रमाणात निधी व जाहिराती दिल्या जातात असे कळते...



आता राहता राहिला राजकारणाचा विषय... सण वार आला लोकांच्या आनंदाची वेळ आली की, कोरोना पद्धतशीरपणे डोके वर काढतो, तो कधीही निवडणुकीच्या वेळेला येत नाही बरं का ? हे ही समजण्यासारखे आहे ..पण तो त्यांच्या कानात येवून सांगतो, बाबा रे मी आता येणार आहे... आता तुम्ही मास्कची बंदी आणा आणि त्याच्यानंतर हळूहळू शहरे, राज्य व देश बंद करण्याची सुरुवात करा....

मागच्या वेळी कोरोना ज्याना झाला होता त्यांना विचारा.... मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर काय उपचार केले गेले... त्यांना असं कोणत औषध दिलं गेलं... याच्यावर कोणी बोलायला तयार नाही त्यांच्या मुलाखती कोणी गोदी मीडियाने घेतल्या नाहीत ..त्यांना ऍडमिट केल्यानंतर असं कोणता उपचार केला गेला... ज्याची बिले चार ते पाच लाख रुपये झाली... त्याच्यावर कधी ही चर्चा झालेली नाही आणि ती करण्याची मानसिकता या पत्रकारांच्याच नाही...

कारण सोन्याच अंडी देणारी कोंबडी कोण कापणार....


कोरोना झाला होता किंवा असं वाटतंय तो एक "सर्दी पडश्या"चाच एक भाग होता. मात्र या सर्दी पडशाला काही उच्च पदस्थ डॉक्टरांनी पाच लाख ,सहा लाख रुपये सुद्धा गरीब लोकांच्या कडून काढून घेतले व ते सर्व जग जाहीर आहे

"डर के आगे जीत है" असे म्हटले जाते म्हणजे अगोदर नागरिकांच्या मनात भीती निर्माण करायची व नंतर त्यांना लुटायचा धंदा कोरोना च्या
माध्यमातून झालेला आहे..आणि तो सुरूच राहणार आहे...

तर या गोदी मीडियाच्या नादाला न लागता आपणच आपला सांभाळ करायचा आहे... या कोरोनामुळे हजारो लोकांचे धंदे चौपट झाले , हजारो नोकऱ्या धुळीला मिळाल्या, हजारो रोजगार निघून गेले, या राजकर्त्यांना.. अधिकाऱ्यांना काहीही फरक पडत नाही कारण की, यांना कोणते काम न करता सुद्धा सरकार जनतेच्या टॅक्स मधून पगार देतच असते...परंतु या मध्ये भरडली जाते ती गरीब जनताच .....

नवीन कोरोनावर लक्ष न देता आपल्याला "सर्दी पडसे" कसे होणार नाही याच्यावर लक्ष देऊन नागरिकांनी आता आपल् संरक्षण आपणच करण्याच आहे..



आम्हीं पाहिलेल आहे... ज्यांना कुत्री धरायची अक्कल नाही... त्या महापालिकेने कोरोना संकट काळात फ्रुट, भाजी, रस्त्यावर विस्कटून, रस्त्यावर बसून गरीब महिलांच्या महिला व भाजी विक्रेत्यांचा माल कचऱ्याच्या गाड्यातून घालून अन्नाची नासाडी व मास्क च्या नावावर अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांचा वेठीस धरून जनतेचा छळ केलेला आहे .

महापालिकेमध्ये यांना कोणतेही प्रकारचे अधिकार नसताना या महापालिकेचे कर्मचाऱ्यांनी ,अधिकाऱ्यांनी अक्षरशः
अकांड  तांडव मांडत नागरिक वर जुलूम केलेला आहे आणि हा जुलूम परत होणार नाही अशी शक्यता नाही..

 (हा प्रकार म्हणजे माकडाच्या हातात कोलीत  दिल्यानंतर काय होत... याचा हा प्रत्यय होता)


 आम्हाला असं कळते की ,कोरोनाच्या गेलेल्या पेशंटला बंदिस्त पॅक करून  दिल्यानंतर त्या मयताची बॉडी सुद्धा बघायची नाही ...असा एक फंडा डॉक्टरांनी शोधून काढला.  ...नंतर काही लोकांनी उघडून बघितलं तर.   त्यांचे डोळे, किडन्या व इतर सर्व अवयव गायब असल्याचे दिसून आलेल आहे. 

 
म्हणजे ही यंत्रणा किती पुढे गेलेली आहे, आपल्या देशातील राजकारण्यांना ही गरीब जनतेची संख्या करण्याची असावी किंवा  गरिबांना... गरीबच करायच आहे. असं या कारणावरून वाटत आहे..

कोरोनावर कित्येक चांगल्या डॉक्टरांनी हे काहीही नसून थोतांड आहे असं बऱ्याच सोशल् मीडियावर त्यांनी आपल्या क्लिप व आपले प्रसार माध्यमातून त्यांनी नागरिकांना सांगितलेल आहे.... परंतु गोदी मीडिया व वर्तमानपत्रांनी जी सरकारच्या हातात आहे. .  त्यांनी त्यांच्या मुलाखती कधी घेतल्या नाहीत. 

 आता परत जनतेच्या मनात आत्मिक भीती निर्माण करण्याचे पद्धतशीरपणे काम आत्ता पासूनच सुरू केलेल आहे
त्याला कांहीं सरकारी अधिकारी सुद्धा सामील आहेत ,कारण यांना त्याच्यातून मलिदा मिळत असतो..
 




 साबणाची जशी दीपावली ची ऍड आहे तशी "चला आता कोरोना आला आणि जनतेला लुटण्याची वेळ झाली"" असा काहीसा प्रकार आता पुढील काळात आपणास दिसून येईल.. तरी सर्व  नागरिकांनी आपापल्या पद्धतीने "सर्दी पडसे" होणार नाही याची काळजी घ्यावी. . हाच आमचा सल्ला असेल... तर "सर्दी पडशाचे" दुसरे नाव कोरोना केलेल आहे ..आणि तो सर्दीतच येतो, थंडीचे दिवस चालू झाले, पावसाळ्याचे दिवस सुरु झाले,   की कोरोना डोकं वर काढतो हे पद्धतशीर केलेल् नाटक आहे ..याच्या विषयी जास्त टीव्ही न बघता, त्या विषयीच्या बातम्या न वाचता आपापल्या कामात  रहावे ..

  "सुज्ञण्यास जादाचे सांगणे न लागावे"

 आपल्या सह ...संपादक लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई सांगली.
8830247886