MUMBAI हिंमत असेल तर शिवसेना भवनाजवळ पाय ठेवून दाखवा ; ठाकरे गट आक्रमक

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

MUMBAI हिंमत असेल तर शिवसेना भवनाजवळ पाय ठेवून दाखवा ; ठाकरे गट आक्रमक



MUMBAI

हिंमत असेल तर शिवसेना भवनाजवळ पाय ठेवून दाखवा ; ठाकरे गट आक्रमक

शिवसेनेच्या नाव आणि चिन्हासाठी 2000 कोटी रुपयांच्या व्यवहाराचे पुरावे योग्य वेळी सादर करणार – संजय राऊत

मुंबई :- केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला बहाल केले. त्यामुळे ठाकरे गटाकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनाजवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. “बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेला पक्ष आणि पक्षाचा धनुष्यबाण हवा. मग बाळासाहेब ठाकरेंच्या कुटुंबीयांना त्रास का देता? उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या पाठिशी ठाकरे गटाच्या या रणरागिणी उभ्या आहेत.” असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.*


एकनाथ शिंदे यांनी शिवसेना भवनाजवळ एकटे येऊन या ठिकाणी पाय ठेवून दाखवावे. आई जगदंबा एकनाथ शिंदेंना पुन्हा रिक्षा चालवायला लावेल. त्यांना कधीही शांतता लाभणार नाही. एकनाथ शिंदेंनी कितीही खटले दाखल केले, तरी आम्ही शिवसैनिक घाबरणार नाही. उद्धव ठाकरेंना त्रास देऊन चांगले केले नाही. आजारी असतानासुद्धा ते खूप काम करतात. एकनाथ शिंदेंचे कधीही चांगले होणार नाही. शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाला संपवायला निघालात, तुम्ही कधीही सुखी होणार नाही, अशी घणाघाती टीकाही महिला कार्यकर्त्यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही त्यांनी टीका केली. “पंतप्रधान मोदी चहा विकत होते. बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना मोठे केले. त्यांच्याच मागे एकनाथ शिंदे गेले. तुम्ही मुंबई खरेदी करायला येणार आणि आम्ही तुम्हाला मुंबई देऊ? अद्यापही निवडणुका लावल्या नाहीत. या लोकांनीच गेम केला. इतकी वर्षे मोदी आणि शहा येत नव्हते, आताच कसे यायला लागले? मुंबई घेण्यासाठी सगळे प्रयत्न सुरू आहेत. या निवडणुकीत शिवसैनिक त्यांची सगळी ताकद दाखवतील.” अशी टीकाही त्यांनी केली.




शिवसेनेच्या नाव आणि चिन्हासाठी 2000 कोटी रुपयांच्या व्यवहाराचे पुरावे योग्य वेळी सादर करणार – संजय राऊत


शिवसेनेचे नाव आणि चिन्हासाठी दोन हजार कोटी रुपयांचा विक्री व्यवहार झाल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला होता. त्या आरोपावर ते अजूनही ठाम आहेत. आज त्यांनी म्हटले आहे की, माझा आरोप पूर्ण खरा आहे आणि त्याचे पुरावेही आम्ही योग्य वेळी सादर करू, आज ते येथे पत्रकारांशी बोलत होते.


ते म्हणाले की, आम्ही चिन्हाच्या संबंधात सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत, तेथे आम्ही निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. शिवसेनेचे नाव आणि चिन्ह चक्क विकण्यात आले असून त्यासाठी तब्बल दोन हजार कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे या आरोपावर मी अद्यापही ठाम आहे. आमचा पक्ष याचे पुरावे योग्यवेळी सादर करेल असे ते म्हणाले. सत्ताधाऱ्यांशी संबंधित एका बिल्डरनेच आपल्याला ही माहिती दिल्याचे त्यांनी काल म्हटले होते.

हा आरोप तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या याचिकेत केला आहे काय असे विचारता ते म्हणाले की त्या याचिकेत हा उल्लेख करण्याची गरज काय, ही माहिती मी माझ्या ठामपणाच्या आधारे पत्रकारांना सांगू शकत नाही काय असा सवालही त्यांनी केला. दरम्यान, या दाव्याबद्दल त्यांच्या विरोधात नाशिक येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे, त्या विषयी विचारले असता राऊत म्हणाले की, असल्या तक्रारींना मी भिक घालत नाही. अशा एक लाख तक्रारी जरी दाखल झाल्या तरी मी घाबरणारा नाही.


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली.