मुंबई: पत्रकार संरक्षण कायद्याची राज्यभर होळी....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

मुंबई: पत्रकार संरक्षण कायद्याची राज्यभर होळी....

     
  
  लोकसंदेश न्यूज नेटवर्क मुंबई

    पत्रकार संरक्षण कायद्याची राज्यभर होळी.....

राज्यात चार वर्षात २२५ पत्रकारांवर हल्ले झाले असले तरी केवळ ३७ प्रकरणांतच पत्रकार संरक्षण कायद्याचे कलम लावले गेले.

महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा असतानाही त्याची कठोरपणे अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांवरील हल्ले पुन्हा वाढले आहेत. त्यामुळे सर्वार्थाने कुचकामी ठरलेल्या या कायद्याची आज राज्यभर होळी करण्यात आली. मुंबईत हुतात्मा चौकात कायद्याची केली होळी...



महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा असतानाही त्याची कठोरपणे अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांवरील हल्ले पुन्हा वाढले आहेत. त्यामुळे सर्वार्थाने कुचकामी ठरलेल्या या कायद्याची आज राज्यभर होळी करण्यात आली. मुंबईत हुतात्मा चौकात कायद्याची होळी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एस. एम. देशमुख यांच्यासह पन्नासाहून अधिक पत्रकारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मुंबईत मुंबई मराठी पत्रकार संघाजवळ पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करण्यात आली. राज्यात आंदोलन शांततेत पार पडले. आंदोलनास राज्यभर अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांवरील हल्ल्यांची संख्या चिंता वाटावी एवढी वाढली आहे. राज्यात चार वर्षात २२५ पत्रकारांवर हल्ले झाले असले तरी केवळ ३७ प्रकरणांतच पत्रकार संरक्षण कायद्याचे कलम लावले गेले. चार वर्षात या कायद्यान्वये एकाही आरोपीला शिक्षा झा नाही. त्यामुळे कायद्याचा धाक उरला नसल्याने पत्रकारांवराल हल्ल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पाचो-यात स्था f आमदार किशोर पाटील यांनी पत्रकारास शिविगाळ केली आणि आपल्या गुंडाकरवी पत्रकारावर हल्ला चढविला. ही चित्रकात महाराष्ट्राने पाहिली असतानाही आमदारांवर किंवा त्यांच्या हल्ले गुंडांवर देखील पत्रकार संरक्षण कायद्याचे कलम लावले गेले असे प्रकार वारंवार आणि सर्वत्र घडत असल्याने पत्रकारांवरील हल्ल पुन्हा वाढले आहेत. हा कायदाच कुचकामी ठरला असल्याने या कायद्याची आज महाराष्ट्रभर होळी करण्यात आली. दुपारपर्यंत मुंबईसह राज्यातील धुळे, अहमदनगर, बीड, नाशिक, बुलढाणा, सातारा,जालना, रत्नागिरी, औरंगाबाद, नांदेड, पालघर, रायगड, सोलापूर, ठाणे, पुणे, हिंगोली परभणी, सिंधुदुर्ग, गडचिरोली, वाशिम, लातूर, कोल्हापूर, अकोला, सांगली, यवतमाळ, वर्धा, नागपूर जिल्ह्यात व राज्यभरातील २५० तालुक्यात आंदोलन झाली आहे

   गुंडांवर दखाल दाखल गुन्ह्यात पत्रकार संरक्षण      कायद्याच कलम लावल गेल नाही...


असे प्रकार वारंवार आणि सर्वत्र घडत असल्याने पत्रकारांवरील हल्ले पुन्हा वाढले आहेत. हा कायदाच कुचकामी ठरला असल्याने या कायद्याची आज महाराष्ट्रभर होळी करण्यात आली. दुपारपर्यंत मुंबईसह राज्यातील धुळे, अहमदनगर, बीड, नाशिक, बुलढाणा, सातारा, जालना, रत्नागिरी, औरंगाबाद, नांदेड, पालघर, रायगड, सोलापूर, ठाणे, पुणे, हिंगोली परभणी, सिंधुदुर्ग, गडचिरोली, वाशिम, लातूर, कोल्हापूर, अकोला, सांगली, यवतमाळ, वर्धा, नागपूर आदी जिल्ह्यात व राज्यभरातील २५० तालुक्यात आंदोलन झाली आहेत...


राज्यातील अकरा प्रमुख पत्रकार संघटनांनी केले आंदोलन

राज्यातील अकरा प्रमुख पत्रकार संघटनांनी केलेल्या या आंदोलनानंतर तहसिलदार, जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात पत्रकार संरक्षण कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी व्हावी, पत्रकारांवरील हल्ल्याचे खटले जलदगती न्यायालयाम चालविले जावेत आणि पाचोर्याचे आमदार किशोर पाटील याच्या विरोधात पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत..


            मुंबईत पत्रकारांना अटक

मुंबईत हुतात्मा चौकात आंदोलन करणा-या एस. एम देशमुख, किरण नाईक, शरद पाबळे, दीपक कैतके, राजा आदाटे, नरेंद्र वाबळे, संदीप चव्हाण, दीपक पवार, राजन पारकर, सतीश माळवदे, विनायक सानप, विशाल परदेशी यांच्यासह पन्नासवर पत्रकारांना आज पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका केली. तत्पूर्वी एस.एम. देशमुख, संदीप चव्हाण, शरद पाबळे यांनी हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या बैठकीस मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, मुंबई मराठी पत्रकार संघ, मुंबई प्रेस क्लब, मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए, बीयुजे, क्राईम रिपोर्टर असोशिएशन पॉलिटिकल फोटो जर्नलिस्ट असोसिएशन, बॉम्बे न्यूज फोटोग्राफर असोसिएशन, मुंबई महानगर पालिका पत्रकार संघ, म्हाडा पत्रकार संघ, उपनगर पत्रकार संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते. एस. एम देशमुख यांनी पाचो-यातील घटनेची पार्श्वभूमी विषद केली. नरेंद्र वाबळे, गुरबीरसिंग आ आपले विचार मांडले. यावेळी किशोर पाटील यांना अटक करण्य जोरदार मागणी करण्यात आली. तेथेच नंतर पत्रकार संर कायद्याची होळी करण्यात आली. आजचे आंदोलन य‍ केल्याबद्दल एस.एम. देशमुख यांनी सर्व पत्रकार संघटना पत्रकारांचे आभार मानले आहेत.
साताऱ्यात पत्रकारांच आंदोलन, पत्रकार संरक्षण कायदयाची केली होळी

         


                सातारा,प्रतिनिधी

राज्यात पत्रकारांवरील वाढते हल्ले आणि पत्रकार हल्ला विरोधी कायदयाची अंमलबजावणी करण्यात राज्य सरकार कुचराई करत असल्याच्या निषेधार्ह साताऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करून राज्य सरकारचा निषेध करण्यात आलाय.सातारा शहरासह तालुक्याच्या ठिकाणी निदर्शने करून पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करण्यात आली.

पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांनी एका पत्रकारास अर्वाच्च शिविगाळ केल्यानंतर आणि चार गुंडांनी पत्रकारावर हल्ला केल्यानंतरही या प्रकरणात पत्रकार संरक्षण कायद्याचे कलम लावले गेले नाही.राज्यातही जेथे जेथे पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना घडतात तेथे तेथे पत्रकार संरक्षण कायद्याचे कलम लावण्यास पोलीस टाळाटाळ करतात.2019 मध्ये कायदा अस्तित्वात आल्यानंतर जवळपास दोनशे पत्रकारांवर हल्ले झाले.त्यांना शिविगाळ केली गेली असून, त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्यात.त्यानंतरही केवळ 37 प्रकरणातच पत्रकार संरक्षण कायदा लावला गेलाय.कायदा आहे पण त्याची अंमलबजावणी होत नसल्याने कायद्याचा धाक उरला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा पत्रकारांवरील हल्ल्यांची संख्या चिंता वाटावी एवढी वाढली आहे.याचा निषेध करत आंदोलन करण्यात आले.
          
              सांगली जिल्हा आंदोलन....




सांगली :पत्रकार संरक्षण कायदयाची कठोर अंमलबजावणी करापत्रकारांची मागणी : कायद्याची गांधी पुतळ्यासमोर प्रतिकात्मक  होळी...

पत्रकारांवरील वाढते हल्ले, पत्रकार संरक्षण कायदयाची अंमलबजावणी करण्यास होत असलेली टाळाटाळ आणि आमदार किशोर पाटील यांच्या अरेरावीचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रातील ११ प्रमुख पत्रकार संघटनांचे सर्व पत्रकार गुरूवारी राज्यभर निदर्शने करून पत्रकार संरक्षण कायदयाची होळी करण्याचा निर्णय घेतला होता, त्याप्रमाणे मराठी पत्रकार परिषेदेश संलग्न सांगली जिल्हा पत्रकार संघ, डिजिटल पत्रकार परिषद यांनी निदर्शने केली 


यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शिवराज काटकर म्हणाले  की, महाराष्ट्रात ८ नोव्हेंबर २०१९ पासून पत्रकार संरक्षण कायदा लागू झाला आहे, हा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे, याचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे. महाराष्ट्राचा हा कायदा पुरेसा सक्षम आणि चांगला असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने तो आता कुचकामी ठरला आहे. राज्यात गेल्या चार वर्षात जवळपास २०० पत्रकारांवर हल्ले झाले किंवा त्यांना धमक्या, शिविगाळ केली गेली. मात्र केवळ ३७ प्रकरणातच पत्रकार संरक्षण कायदा लागू केल्याने आणि त्यातील एकाही प्रकरणात आरोपीला शिक्षा न झाल्याने या कायद्याची उपयुक्तता संपली असून कायदयाची भितीच समाजकंटकांचा मनात उरली नाही. सांगली जिल्ह्यात सुद्धा दोन प्रकरणे घडली, ज्या अजून आरोपी मोकाट आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा चिंता वाटावी एवढ्या मोठ्या संख्येनं पत्रकारांवरील हल्ले वाढले आहेत."

जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी म्हणाले, पाचोरा येथील एका पत्रकारास आमदार किशोर पाटील यांनी अगोदर शिविगाळ केली आणि दुसरया दिवशी आपल्या गुंडाकरवी त्यांच्यावर हल्ला चढविला, हे चित्र उभ्या महाराष्ट्राने पाहिले, ऐकले आहे. असे असले तरी मारहाण करणारया गुंडांवर किंवा शिविगाळ आणि धमक्या देणारया आमदार किशोर पाटील यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल झालेला नाही, पत्रकारांवर जे हल्ले होतात त्यातील ७५ टक्क्यावर हल्ले हे राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून होतात हे वास्तव आकडेवारीसह समोर आलेलं आहे, मग अशा प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होतात आणि पोलीस पत्रकार संरक्षण कायद्याचं कलम न लावता साधी एनसी दाखल करून हा विषय बंद करून टाकतात, असे प्रकार वारंवार आणि सर्वत्र दिसून येत आहेत, हे थांबलं पाहिजे,

यावेळी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष बलराज पवार, सरचिटणीस प्रवीण शिंदे, हल्ला विरोधी संघाचे अध्यक्ष गणेश कांबळे, डिजिटल मीडिया अध्यक्ष तानाजी जाधव, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत क्षीरसागर, प्रकाश वीर, उदयसिंग राजपूत, चंद्रकांत गायकवाड, विकास सूर्यवंशी, सचिन ठाणेकर, कुलदीप देवकुळे, किशोर जाधव, किरण जाधव, दारिकांत माळी आदींसह विविध दैनिक आणि माध्यमांचे पत्रकार यावेळी मोठ्या संख्येत उपस्थित होते....

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.