सांगली बंधाऱ्याचे लोखंडी बर्गे बदलण्यासाठी ३० लाख; पृथ्वीराज पाटील यांच्या मागणीला यश

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सांगली बंधाऱ्याचे लोखंडी बर्गे बदलण्यासाठी ३० लाख; पृथ्वीराज पाटील यांच्या मागणीला यश




लोकसंदेश न्यूज नेटवर्क

सांगली बंधाऱ्याचे लोखंडी बर्गे बदलण्यासाठी ३० लाख; पृथ्वीराज पाटील यांच्या मागणीला यश

कृष्णा नदीवरील सांगली बंधाऱ्याचे लोखंडी बर्गे बदलण्यासाठी पाटबंधारे विभागाने बिगर सिंचन विभागातून ३० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याची निविदा लवकरच निघणार असून नवीन लोखंडी बर्गे बसवले जाणार आहेत. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी ही मागणी शिष्ट मंडळासह अधीक्षक अभियंता पाटोळे यांच्या कडे निधी मागणीसाठी प्रस्ताव पाठविणे करीता केली होती. 


  त्यांनीही त्वरीत कारवाई करणे बाबत आश्वासन दिले होते त्यानंतर त्याला यश आले आहे.
सांगली बंधाऱ्यात पूर्वी लोखंडी बर्गे वापरले जात होते. ते कुजून निकामी होवू लागल्यानंतर काही वर्षांपूर्वी लोखंडी बर्गे बसवण्यात आले. दीर्घकाळ पाण्यात राहिल्याने तेही गंजून गेले. त्याची पाणी अडवण्याची क्षमता कमी झाली. त्याला मोठे खड्डे पडले. पाणी वाहून जावू लागले. त्याने टंचाई काळात बंधाऱ्यातील पाणी कमी होवू लागले. गेल्या चार महिन्यात दोनवेळा नदी कोरडी पडली. त्याला काही प्रमाणात हे बर्गे चांगले नसण्याचे कारण होतेच. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी बंधाऱ्याची पाहणी करून तेथील बर्गे बदलणे गरजेचे आहे आणि त्यासाठी तातडीने निधी मंजूर करावा, अशी मागणी पाटबंधारे विभागाकडे केली होती. त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्याला यश आले.  

पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर म्हणाल्या, ‘‘बंधाऱ्यातून पाणी वाहून जाण्याचे प्रमाण वाढले होते. आता बर्गे बदलण्यासाठी बिगर सिंचनमधून ३० लाखांचा निधी आम्ही मंजूर केले आहे. त्यात सगळे बर्गे बदलले जातील, अशी अपेक्षा आहे. त्यानुसार निविदा काढली जाईल.’’


               तातडीने काम व्हावे....

पृथ्वीराज पाटील म्हणाले, की कृष्णा नदीवरील सांगली बंधारा आहे म्हणून शहरातील सहा लाख लोकांना पाणी पुरवठा शक्य आहे. तो मजबूत असणे गरजेचे आहे. त्याची मी पाहणी केली. बर्गे खराब झाल्याने पाणी वाहून जात होते. यावर्षी टंचाई आहे. पाण्याचा जपून वापर गरजेचा आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाला विनंती केली, तातडीने बर्गे बदलावेत, त्यासाठी निधी मंजूर करावा. त्याला यश आले आहे. निविदा प्रक्रिया लवकर राबवून उन्हाळा सुरु होण्याआधी हे काम पूर्ण करावे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.