विधानसभेच्या निवडणूकीत निवडून आलेल्यांना बॅलेट पेपरवरील निवडणूकीत अर्धी सुद्धा मत मिळत नाहीत - रोहिणी खडसे
काळ जी सातारा येथे सहकारी साखर कारखाना ची निवडणूक पार पडली त्यामध्ये माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पॅनल भरघोस मताधिक्याने निवडून आले,
यावरून असं लक्षात आलं की बॅलेट पेपरवर निवडणुका होत आहेत तर लोकांचा कौल हा आमच्या बाजूने दिसतोय, चार महिन्यांपूर्वी ज्या विधानसभेची निवडणूक झाली आणि मशीनमध्ये मतदान झालं ज्या आमदारांना 50000 च्या मताने निवडून आलेत आता तेच आमदार अर्धी सुद्धा मतं बॅलेट पेपर वरती घेऊ शकले नाहीत, विरोधकांनी अमाप पैशाचा वाटपही केलं तरी देखील अर्धीही मत घेऊ शकले नाहीत, ई एम व्ही मशीन वरती शंकाच आहे,
विधानसभेच्या निवडणुकीच्या बाबतीत जे घडलं त्याची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी केली आहे .