महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष समीर काझी यांची पत्रकार परिषद
ऐतिहासिक आमखास मैदानावर महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, अल्पसंख्याक आयुक्तालय व मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयाचे इमारत बांधण्याचा निर्णय माजी अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी १३ ऑगस्ट २०२४ रोजी घेतला. ४ ऑक्टोबर २०२४ रोजी या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली. राज्य शासनाने एका इमारतीसाठी १४.९९ कोटी असे तीन इमारतीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधी देण्यासाठी फेब्रुवारी २०२५ ला मान्यता दिली. हे सर्व निर्णय उच्च स्तरावर घेतला गेला. यामध्ये वक्फ बोर्डाचे देणेघेणे नाही. पनचक्की येथे कार्यालयाला जागा कमी पडत असल्याने, शासनाने हा निर्णय घेतला होता. असे म्हणत कालच्या घटनेवर वक्फ बोर्डाचे चेअरमन समीर काझी यांनी हात झटकले आहे. इम्तियाज जलील यांनी इमारतीच्या बांधकामासाठी होत असलेले खोदकाम थांबवल्यानंतर वक्फ बोर्डाच्या वतीने अल्पसंख्याक सचिवांना पत्र लिहून सार्वजनिक बांधकाम विभागाला हे काम थांबवण्याची विनंती केली आहे. या जागेवर इंटरनॅशनल फुटबॉल स्टेडियम बनवण्यासाठी २९ एकर जागेपैकी ११ एकर जागा अधिग्रहित करण्यात आली आहे. त्या जागेला हात लावले जाणार नाही. कार्यालय काही अंतरावर बनवले जात आहे. स्टेडियमची एनओसी वक्फ बोर्डाने रद्द केली नाही. जी जागा स्टेडियमची आहे तेथे स्टेडियमच बनवणार.
अफवांवर जनतेने विश्वास ठेऊ नये. वक्फ बोर्डाचे कामकाज पारदर्शकपणे सुरू आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. माजी खासदार इम्तियाज जलील यांनी तीन वर्षे वक्फ बोर्ड सदस्य म्हणून येथे काम केले आहे. त्यांना माहीत आहे येथे कामकाज कसे चालते. त्यांना कोणीतरी चुकीची माहिती दिली आहे. शंका कुशंका असतील तर त्यांनी वक्फ बोर्डाशी चर्चा करावी. आम्ही चर्चा करण्यासाठी तयार आहोत. त्या कामात काही अनियमितता आढळल्यास चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल. 29 एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वक्फ बोर्डाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी वक्फ बाबत चांगले निर्णय घेतले जात असल्याचा विश्वास व्यक्त केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ५ मे २०२५ रोजी वक्फ बोर्ड, अल्पसंख्याक विकास विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त बैठक मुंबईत आयोजित केली आहे. या बैठकीत आमखास मैदान प्रकरणावर उचित निर्णय घेतला जाईल. अशी माहिती आज सकाळी वक्फ बोर्ड कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत चेअरमन समीर काझी यांनी दिली आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली