LOKSANDESH NEWS
एका तासाच्या पावसाने भिवंडीकरांचे हाल
भिवंडीत बुधवारी दुपारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. एक तासभर कोसळलेल्या मुसळधार पावसाने भिवंडीकरांचे हाल झाले. शहरातील अनेक सकल भागांमध्ये पाणी साचले होते. तर काही नागरिकांच्या घरात गटारीचे दूषित पाणी शिरल्याने मनपा प्रशासनाचा नालेसफाईचा दावा पुरता फोल ठरला आहे.
शहरातील पद्मा नगर येथील श्रीरंग नगर व भद्रावती नगर मध्ये नागरिकांच्या घरात नाल्याचे दूषित पाणी शिरले होते, त्यामुळे अनेकांचे घरातील सामानाचे नुकसान झाले. गटारातील पाणी घरामध्ये शिरल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.