डोंबिवलीचे लोक खूप सहनशील झाले आहेत - दीपेश म्हात्रे
डोंबिवलीचे लोक खूप सहनशील झाले आहेत. बाकीच्या शहरांप्रमाणे कोणत्याही समस्येबाबत उद्रेक होत नाही. त्यामुळे इथल्या सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात हवा गेली आहे. लोकांनी शिवसेना ठाकरे पक्षासोबत राहून रस्त्यावर उतरावे तर नियोजन शून्य झालेल्या ट्रॅफिकची समस्या सुटणार असे विधान शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून कल्याण शीळ रस्त्यावर होत असलेल्या ट्रॅफिकमुळे नागरिक त्रस्त आहे. भर उन्हात वाहतूक कोंडीत अडकलेल्या लोकांचे हाल होत आहे.
कल्याण शीळ रस्त्यावर रोज ट्राफिक कोंडी होत आहे. कल्याण शीळ रस्त्याचे सहा पदरी काम करण्यात आले. हे काम ८० टक्के पूर्ण झाले असले तरी २० टक्के काम भूसंपादनाचा मोबदला दिला गेला नसल्याने रखडलेले आहे. त्यामुळे काही ठिकाणी काम पूर्ण झालेले नाही. त्यात पलावा उड्डाण पूलाच्या कामाची रखडपट्टी सुरु आहे. याशिवाय कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत रुनवाल गार्डन दरम्यान कल्याण शीळ रस्त्यावर कल्याण तळोजा मेट्रो मार्गाचे काम सुरु आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. कल्याण शीळ रस्त्याच्या आड येणारी बेकायदा बांधकाम हटविण्यासाठी गेल्या १० वर्षात वाहतूक पोलिस नियंत्रण शाखेने कल्याण डोंबिवली महापालिकेकडे कोणताही पाठपुरावा केला नाही अशी कबूलीच वाहतूक शाखेने दिली आहे. या वाहतूक कोंडीचा परिमाण शहरातील वाहतूकीवर होत आहे. डोंबिवली पूर्वेतून पश्चिमेला जाण्याकरीता वाहतूक कोंडीमुळे विलंब होत आहे. अनेकांना भर उन्हात वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे. यावेळी मुख्यमंत्री आणि केडीएमसी आयुक्तांना मागणी केली आहे. १९९९ नंतर केडीएमसीत नोकर भरती केली जाणार आहे. केडीएमसी नोकर भरतीत भूमीपूत्रांना प्राधान्य द्यावे अशी मागणी केली आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली