जालना जिल्ह्यातल्या बदनापूर शहरासह अन्वी, भराडखेडा, कंडारी बुद्रुक, कंडारी, खुर्द ,वाला यासह इतर आसपासच्या गावांवर आज दुपारी ३:२५ च्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे, शिवाय या तुफान गारपीटित शेतकऱ्यांचे रब्बी पिके संकटात सापडले असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे,
या अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाल्याचाही पहायला मिळाले. मात्र या वादळी वाऱ्यात व गारपीटीमध्ये कुठलीही जीवित हानी जरी झाली नसली, मात्र शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली