LOKSANDESH NEWS
लांजा तालुक्यातील ग्रामीण भागातील सापूचेतळे, वाडी लिंबू, आगवे, वाघ्रट या गावांना पावसाने झोडपले
रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. लांजा तालुक्यातील ग्रामीण भागातील सापूचेतळे, वाडी लिंबू, आगवे, वाघ्रट या गावांना चांगलेच झोडपून काढले. जोरदार वाऱ्यासह पडणाऱ्या या पावसामुळे आंबा बागायतदार आणि व्यापारी धास्तावले गेले आहेत.
पावसाच्या जोरदार सरींमुळे सर्वत्र पाणी ओसांडून वाहत आहे. हवामान खात्याने पुढील दोन ते तीन दिवस अवकाळी पाऊस पडणार असल्याचे इशारा दिला आहे. अरबी समुद्रात चक्रीय परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली