नगररचना अभियंत्याकडून डायरेक्ट आयुक्तांना लाचेची ऑफर...
आजम जमादार सेवेतून बडतर्फ; सत्यम गांधी यांचा दणका...
सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या कुपवाड कार्यालयातील मानधनावरील
शाखा अभियंता आजम सलीम जमादार याने नगररचना विभागातील प्रस्तावांना मंजुरी देण्याच्या बदल्यात आयुक्त सत्यम गांधी यांनाच लाच स्वीकारण्यास प्रवृत्त करण्याचा प्रकार केला. आयुक्त गांधी यांनी हा प्रकार गांभीर्याने घेत जमादार यास सेवेतून बडतर्फ केले.
आयुक्त गांधी यांनी कुपवाड येथील विभागीय कार्यालयाला 28 एप्रिल रोजी भेट दिली होती. त्यावेळी कार्यालयात नागरिकांची गर्दी झाली होती. नागरिकांना विचारणा केली असता नागरिकांनी नगररचना विभागाकडून कामे होत नसल्याची तक्रार केली. या कार्यालयात दैनंदिन कामकाजाचा निपटारा होत नसल्याचे आढळून आले. येथील स्थापत्य अभियंता अल आजम जमादार हा
कार्यालयात अनेकवेळा उपस्थित नसल्याचे दिसून आले. हालचाल वहीत नोंद न करता, वरिष्ठांची परवानगी न घेता ते कार्यालय सोडत असल्याचे आढळून आले होते. दरम्यान, नगररचना विभागाकडील प्रस्तावास मान्यता देण्याच्या बदल्यात आर्थिक मोबदला देण्याबाबत जमादार याने आयुक्तांना समक्ष विचारणा केल्याचाही प्रकारही घडला. वरिष्ठांना लाच स्वीकारण्याबाबत प्रवृत्त करत असल्याची अत्यंत गंभीर बाब घडली. आयुक्त गांधी यांनी नोटीस बजावली. नोटिसीला समाधानकारक उत्तर न आल्याने स्थापत्य अभियंता (मानधन) या सेवेतून कार्यमुक्त केले आहे. जमादार याच्याकडील महापालिकेचे ओळखपत्र, नगररचना विभागाकडील कामकाजाची कागदपत्रे नगररचना कार्यालय, महापालिका क्षेत्रीय कार्यालय क्रमांक तीन येथे तत्काळ जमा करावीत, असे आदेशही आयुक्त गांधी यांनी दिले आहेत.
महापालिकेतील लाच प्रकरणामुळे नगररचना विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे..
संपादकीय....
सांगलीचा नगर रचना विभाग.. म्हणजे भ्रष्टाचाराने युक्त असलेला भाग.. हे सर्वश्रुत आहे.. 24 मजले बिल्डिंग साठीच्या परमिशन साठी तत्कालीन आयुक्त , उपायुक्त यांनी दहा लाख रुपये मागितल्याचे समजून येत आहे... बदली झालेले आयुक्त सुद्धा याच्यामध्ये सहभागी असल्याचे कळून येतय... अजून हे प्रकरण ताज असताना आयुक्तांना डायरेक्ट असा प्रश्न विचारायच धाडस !!!!. म्हणजे नगर विकास खात्यामध्ये किती भ्रष्टाचार बोकाळलेला आहे ..त्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांची सहमती घ्यावी का !!! इथपर्यंत मजल या लोकांची गेली आहे....अरे बाबा जरा एखाद्याचा अंदाज तरी घ्यायचा.. सर्वजण भ्रष्टाचारी असतील असे नाही..काहीं प्रामाणिकपणाने पण काम करीत असतात.. . नगररचना खात्यास खरोखरच प्रामाणिक आयुक्तानी दणका दिल्यामुळे सांगलीकरांना क्षणिक का होईना समाधान लाभलेल आहे... परंतु अशीच कार्यकिर्द माननीय आयुक्तांची कायम राहिली तर .... सांगलीकरांना योग्य न्याय मिळेल असे आम्हास वाटते .... पाहू या आता.. "आगे आगे होता हैं क्या..??
संपादक: लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड. मुंबई /सांगली.