रायगड.. रसायनी..आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी रसायनीत सायबर साक्षर अभियान उपक्रम

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

रायगड.. रसायनी..आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी रसायनीत सायबर साक्षर अभियान उपक्रम




रसायनी, लोकसंदेश प्रतिनिधी --राकेश खराडे

रायगड पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने पोलिस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी संजय शुक्ला, रसायनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांच्या सहकार्यातून
ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेचे महाराष्ट्र सचिव गणेश थोरवे आणि रसायनी पोलिस ठाण्याच्या वतीने कांबे गावातील विठ्ठल रखुमाई मंदिरात सायबर साक्षर अभियान राबविण्यात आले.यावेळी कांबे गावासह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग‌ घेतला होता.

या वेळी सायबर व्हिलेज हि संकल्पना राबविण्याअगोदर कांबे येथील हभप बाळाराम महाराज कांबेकर, रसायनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे,आॅल इंडिया पोलिस जनसेवा संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव गणेश थोरवे आदींच्या हस्ते मंदिराच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.यानंतर महिला व बालकल्याण माजी सभापती उमाताई मुंढे यांच्याहस्ते दिपप्रज्वलन करुन साक्षर सायबर अभियानाला सुरुवात करण्यात आली.आॅल इंडिया पोलिस जनसेवा संघटना यांच्यावतीने आभारप्रदर्शनाचा कार्यक्रम झाल्यानंतर मान्यवरांचे आभार मानण्यात आले. रसायनी पोलिस यावेळी ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक धनाजी काळे यांनी सायबर साक्षर सुरक्षित कांबे गाव अभियानियावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.यावेळी पोलिस उपनिरीक्षक धनाजी काळे म्हणाले की कमी कालावधीत पैसे दुप्पट करण्याच्या कोणत्याही योजनेमध्ये गुंतवणूक करु नये, कोणत्याही साखळी योजनेत,मल्टीलेवल मार्केटिंग योजनेत पैशाची गुंतवणूक करु नये,
सायबर क्राईम फिशींग व्यवहारात आपले बॅक खाते बंद पडले आहे,असे सांगून आपल्या एटीएमचा पिन कोड नंबर घेऊन खाते हॅक केले जाते, यावेळी आपण माहिती दिल्यानंतर आपल्याला मेसेज येतो.यासाठी कोणालाही आपला ओटीपी नंबर देवू नये, नवीन गृहप्रकल्पाची जमीन बिनशेती असल्याची खात्री झाल्यावरच पुढील कार्यवाही करावी,नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक टाळावी, आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी आपणच आपली खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे पोलीस उपनिरीक्षक धनाजी काळे यांनी बोलताना सांगितले.तर रसायनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांनी कोरोना संसर्गापासून आपणच आपल्या सुरक्षिततेसाठी सोशल डिस्टंस राखून मास्क व सॅनिटायझरचा वापर करून सावधानता बाळगावी,असे आवाहन केले.
यावेळी रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे , पोलिस उपनिरीक्षक धनाजी काळे, पोलिस नाईक विशाल झावरे, पोलिस नाईक मंगेश लांगी,महिला व बालकल्याण माजी सभापती उमाताई संदिप मुंढे,हभप बाळाराम महाराज कांबेकर,हभप सच्चिदानंद महाराज गोंधळी, समाजसेवक प्रकाशशेठ गायकवाड,माजी उपसरपंच दत्तात्रेय जांभळे, डॉ.संजय कुरंगळे,नंदू कुरंगळे,दिप्ती म्हात्रे, निखिल डवले, अनिल पिंगळे आदी
उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आॅल इंडिया पोलिस जनसेवा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सागर काशिनाथ कुरंगळे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.