महाबळेश्वरला पावसाची जोरधार... सोळशी व कोयना नदी पात्रात पाण्याची पातळी वाढली....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

महाबळेश्वरला पावसाची जोरधार... सोळशी व कोयना नदी पात्रात पाण्याची पातळी वाढली....

महाबळेश्वरला पावसाची जोरधार...
सोळशी व कोयना नदी पात्रात पाण्याची पातळी वाढली....


SATARA
महाबळेश्वर ; लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी

 काल पासून महाबळेश्वर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे, सकाळ पासूनच  पावसाच्या दमदार सरी कोसळत असल्याने महाबळेश्वरात जून महिन्यात झालेल्या पावसा पेक्षा जास्त पाऊस झाल्याचे समजून येत आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी व  महाबळेश्वरवासीयांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः महाबळेश्वर मधील तापोळ्या जवळील" दरे " या दुर्गम गावातून येत असल्याने आता आपल्या भागातील मुख्यमंत्री झाल्यामुळे किमान आपल्या रस्त्यांची, आपल्या पुलांची, आपल्या महाबळेश्वर व साताऱ्यातील या भागाचे काहीतरी योग्य प्रगती व नियोजन होईल असे आता महाबळेश्वरकरांना वाटत आहे
महाबळेश्वरात नेहमीच जोरदार पाऊस पडतो. मात्र या वर्षी संपूर्ण जून महिन्यात फक्त १५ इंच पावसाची नोंद झाल्याने चिंता व्यक्त केली जात होती. येथे होणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेकवेळा घाट रस्त्यांवरील दरडी कोसळणे, घाट रस्ता बंद होणे अशा घटना घडत असतात. आणि पूल दुरुस्त केले होते. 


गेल्या काही दिवसांपासून महाबळेश्वर आणि
प्रतापगड परिसरात झालेल्या पावसामुळे चतुरबेट भागातील पूल आणि रस्त्यांची दुरवस्था झाली येथील कच्चा पूल पाण्यात वाहून गेला आहे. यंदा म्हणावा तसा पाऊस अद्याप सातारा जिल्ह्यात झाला नव्हता


मुसळधार पावसाची नोंद २२ इंच इतकी गेली आहे. तर गेल्यावर्षी हीच नोंद ५२ इंच इतकी होती. महाबळेश्वरच्या लगतच्या पाण्यात वाहन गेला आहे. भागातही आज जोरदार पाऊस झाला आहे.

         महाबळेश्वर मध्ये चक्क धुक्याचे त्याचे  ढग


त्यामुळे गावातील ग्रामस्थांची दळणवळणाची दरम्यान गतवर्षी जुलै महिन्यात झालेल्या अडचण झाली आहे.
यंदाच्या पावसाने कोयना व सोळशी नदी मध्ये पाणी वाढल्याने 
आता नियोजित पुलाचे काम लवकरात लवकर व्हावे व दरे - तापोळा नियोजित पूल लवकरात लवकर पूर्ण व्हावा.... अशीही अपेक्षा महाबळेश्वर वासियांकडून करण्यात येत आहे
 काही भाग हा दुर्गम असल्याने ग्रामस्थांना दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी पर्यायी मार्ग शोधावे लागत आहे. जिल्हा प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन रस्ते आणि पूल दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत त्यामुळे आगामी काळात अतिवृष्टी झाली तर खूप मोठ्या प्रमाणात या भागातील रस्त्याचे आणि पुलांचे नुकसान होऊ शकते असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे

यंदा महाबळेश्वर आणि प्रतापगड भागात पडत असलेल्या पहिल्याच पावसात चतुरबेट पूल अतिवृष्टीमुळे या भागातील रस्ते पूल वाहून गेले होते. त्यानंतर प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात रस्ते दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांत होत आहे.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली