माजी मंत्री अनिल देशमुख पत्रकार यांची परिषद
- पहलगाम याठिकाणी झालेल्या हल्ल्यावर सर्व पक्षांनी मिळून उत्तर दिलं पाहिजे
- पहलगाम मध्ये जेव्हा हल्ला झाला तेव्हा बैसरन व्हॅली आणि जवळपास अनेक किलोमीटर पर्यंत सैन्य किंवा पोलीस नव्हते, असा आरोप होत आहे यावर अनिल देशमुख म्हणाले की, काल सर्व पक्षीय बैठक झाली त्याठिकाणी सुद्धा हा मुद्दा विचारण्यात आला, इतका वेळ मदतीसाठी का लागला, काही वर्तमान पत्रात पण वाचलं की केंद्र सरकारने सांगितले की, आम्ही कुठं चूक झाली याची चौकशी करत आहे
- पाकिस्तान जेव्हा अशांती करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्यांना जोरदार उत्तर देणार नाही तोपर्यंत यांची अशीच हिम्मत वाढत जाईलम्हणूनच सर्व पक्षांनी एकत्र येऊन केंद्र सरकारने कडक पाऊलं उचलावी.
- नळगंगा प्रकल्पात वरुड, मोर्शी, काटोल, नरखेड तालुक्यांचा समावेश करा अन्यथा इथले शेतकरी रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली