पहलगाम घटनेच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनां आक्रमक, राजकमल चौक ते जिल्हाकचेरी दुचाकी मोर्चा
दोन दिवसांपूर्वी जम्मू काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला. ज्यात निष्पाप पर्यटकांचा जीव गेला. या घटनेच्या निषेधार्थ तसेच मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांप्रति संवेदना व्यक्त करण्यासाठी आज सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी दुचाकी मोर्चा काढला. तत्पूर्वी, राजकमल चौकात श्रद्धांजली सभा घेण्यात आली. यामध्ये पहलगाम हल्ल्यातील बळी गेलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर दुचाकी मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. या मोर्चात संताप व्यक्त करीत पाकिस्तान विरोधात तीव्र नारेबाजी करण्यात आली.
आता हे बस झालं पाकिस्तान कडुन या घटना वारंवार घडतात या घटनांना आता कुठे तरी आळा बसला पाहिजे आणि पाकिस्तानचं नाव आणि पाकिस्तानचा या संपूर्ण जगाच्या नकाशावरून गायब झाला पाहिजे ही आता काळाची गरज आहे. तसेच हिंदू संघटनांची शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. तसेच या हल्ल्यातील जबाबदार पाकिस्तान वर कारवाईची मागणी केंद्र सरकारला करण्यात आली.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली