LOKSANDESH NEWS
शिंदे हे बाळासाहेबांचे विचार नाहीतर अमित शहा आणि मोदी यांचे विचार चालवितायत- वैभव नाईक
ऑन बाळासाहेबांच्या आवाजाची नक्कल म्हणजे पोरकटपणा आणि उबाठेपणा या एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावर
- खरं तर आमचा पक्ष बाळासाहेबांच्या विचारांवर चालतोय. बाळासाहेबांचा वारसा कोण चालवू शकतात तर त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे. आज मागील १५ वर्षे उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा वारसा सक्षमपणे चालवितायत. आज जरी एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचे विचार नाहीतर अमित शहा आणि मोदी यांचे विचार चालवितायत. त्यांनी जी स्क्रिप्ट दिलीय ती शिंदे वाचतायत आणि अमलात आणतायत.
तसेच बाळासाहेबांचा करारीपणा जो होता तो उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आहे. सत्तेला लाथ मारून ते आज विरोधी पक्षामध्ये ते आपली भूमिका प्रखरपणे मांडत आहेत आणि तेवढी हिम्मत लागते व ती उद्धव ठाकरेंमध्ये आहे.
बाळासाहेबांचे विचार अंगीकृत करण्यासाठी कोणी सांगण्याची गरज नाही. उद्धव ठाकरे म्हणतायत की मी माझ्या बापाचे नाव लावले इतरांनी आपल्या बापाचे नाव लावावे. त्यामुळे बाळासाहेबांचे विचार हे उध्दव ठाकरे समजू शकतात.
ऑन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तडीपारी प्रकरणे
- सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक तडीपारीची प्रकरणे आहेत. आज राजकीय हेतूने राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांना तडीपार केले आहे. पण ज्यांचे कोणी आका आहेत त्यांच्यामुळे काहींना तडीपारी होत नाही. कुडाळ तालुक्यात असे अनेक आहेत ज्यांना तडीपारीच्या नोटीस आल्यात पण पोलीस काही आकांच्या दबावामुळे कारवाई करीत नाहीत. याबाबत गृहमंत्री फडणवीस यांना विनंती करणार आहोत की, ही तडीपार कारवाई करावी.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली