LOKSANDESH NEWS
पहलगाम मधून नागपूरचे रूपचंदानी कुटुंबीय सुरक्षित नागपुरात दाखल
जम्मू - कश्मीरच्या पहलगाम मधून नागपूरचे रूपचंदानी कुटुंबीय सुरक्षित नागपुरात दाखल झाले आहे. सिमरन रूपचंदानी यांनी गोळीबाराचा आवाज ऐकताच घटनास्थळावरून उडी मारली होती.
टेकडीवरुन उडी मारल्यामुळे त्यांचा जीव या घटनेत वाचला. त्यांचे पती तिलक रूपचंदाने आणि मुलगा गर्व रूपचंदनानी यांचा सुद्धा जीव या घटनेत वाचला आहे. तिघेही रूपचंदानी कुटुंबातील सदस्य सुरक्षित नागपुरात दाखल झाले आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली