लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे याचं भारत- पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर विश्लेषण

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे याचं भारत- पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर विश्लेषण


                        लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे याचं भारत- पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर विश्लेषण
 


- विदेशमंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाने घेतलेला जॉईंट प्रेस ब्रिफिंग मध्ये अत्यंत महत्त्वाच्या अशा बाबी आपल्यासमोर आलेले आहेत

- एका बाजूला कशाप्रकारे पाकिस्तान हा वेळोवेळी युद्धखोरीच्या कारवाया करतो, याच्याविषयीची अधिकृत माहिती मिळाली

- तर दुसऱ्या बाजूला त्याला जशास तसे उत्तर देण्यासाठी भारताच्या आन्ड फोर्सेस तर्फे काय काय कारवाया केल्या याची सुद्धा माहिती देण्यात आली

- त्याच्या सोबतीला मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेस तर्फे एक प्रकारे डिस इन्फॉर्मेशन कॅम्पेन पाकिस्तान तर्फेचे चालवलं जातंय त्याचा सुद्धा बुरखा फाडण्याचा करण्याचा प्रयत्न केला.

- मुळातच मागच्या काही तासांमध्ये आणि मुख्यतः कालच्या रात्री पाकिस्तानला मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये एअर स्पेस व्हायलेशनच्या माध्यमातून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला,26 वेगवेगळ्या ठिकाणावर टार्गेटवर 26 शहरांमध्ये एक प्रकारे जे आहे एअर स्पेसच्या व्हायलेशनच्या माध्यमातून पाकिस्तानला हल्ला करण्याचा प्रयत्न केला,

- ज्यामध्ये काही ड्रोन हल्ले होते, त्याच बरोबर एक प्रकारच्या फायटर जेट्स आणि लॉन्ग रेंज वेपनचा मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानने वापर केला.

- अस जरी पाकिस्तानला वापर केला असला तरी सुद्धा आपली एअर डिफेन्स सिस्टम मजबूत होती, आणि या 26 पेक्षा सुद्धा जास्त हल्ल्यांना जास्तीतजास्त आपण न्यूट्रलाइज करण्यामध्ये आपण यशस्वी झालो

- मुख्यतः पाकिस्तानचा जोर हा भारतामधल्या वेगवेगळ्या प्रकारच्या मिलिटरी टार्गेट्सला अटॅक करण्याचा होता, आणि त्याहून महत्त्वाचं जे सिव्हिलियन इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जे सामान्य लोक आहेत, त्यांच्यावर सुद्धा टार्गेट करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला

- जम्मू आणि कश्मीरमध्ये असणाऱ्या शाळा असतील,जम्मू आणि कश्मीरमध्ये असणारे वेगळ्या प्रकारचे हॉस्पिटल्स असतील, एवढंच नाही, तर तिथले एडिशनल कमिशनर थापा यांचा सुद्धा दुर्दैवी या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्याची बातमी आणि तशा प्रकारचा कन्फर्मेशन मध्ये देण्यात आले.

- मुळातच हा सगळा प्रकार पाकिस्तान हा सिविलियन टार्गेट त्याच बरोबर मिनिट टार्गेटला अटॅक करण्यासाठी त्या ठिकाणी करतोय, आणि थोडीशी क्षती जरी आपली त्याठिकाणी झाली असली तरीसुद्धा भारताला सुद्धा रेसिप्रोकल म्हणजे जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न मागच्या काही तासांमध्ये पाकिस्तान मध्ये घुसून केला, आणि यासाठी महत्त्वाचे अशा प्रकारचे फायटर जेट याचा सुद्धा भारताला उपयोग केल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली.

- भारताने पाकिस्तान मध्ये घुसून, पाकिस्तानचे महत्त्वाचे स्ट्रॅटेजिक एअरबेस, ज्यामध्ये मुरीद सारखे एअर बेस आहे, जिथे पाकिस्तानचे युकॅब म्हणजेच अनमॅनड कमबॅट एरिअल व्हेईकल मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, त्याला जे आहे उध्वस्त करण्यामध्ये यश मिळाले, नूरखान सारखे एअरबेस ज्या ठिकाणी व्हीआयपी विमानांचे लँडिंग होते, त्याला सुद्धा उद्धवस्त केले

- पाकिस्तानच्या सियालकोट मध्ये जिथे महत्त्वाची अशी रडार सिस्टम आहे त्याला सुद्धा उद्धवस्तं करण्यामध्ये यश मिळालेला आहे, आणि वेगवेगळ्या प्रकारचे असे एअर बेस ज्यामध्ये रफिकी इयर बेस सुद्धा समावेश आहे, यावर जोरदार प्रहार फायटर जेटच्या माध्यमातून भारताने केला हे सुद्धा माहिती या पत्रकार परिषदेमध्ये त्या ठिकाणी देण्यात आली.

- मुळात भारतान भारतावर झालेल्या या एअर स्पेस व्हायलेशनच्या माध्यमातून झालेल्या हल्ल्यांना एअर डिफेन्स सिस्टमच्या माध्यमातून न्यूट्रलाइज केलं तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान मध्ये घुसून जोरदार कारवाई करत पाकिस्तानचे महत्त्वाचे स्ट्रॅटेजिक एअरबेस उद्ध्वस्त केले

डिसइन्फॉर्मेशन कॅम्पिंग जे आहे त्याला उद्धवस्त करण्याचं काम फॉरेन सेक्रेटरी विक्रम मिस्त्री यांनी केलं आणि या सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये प्रूफ देऊन त्या प्रकारचे फोटो त्या प्रकारचे व्हिडिओज दाखवून एक प्रकारे बुरखा फाडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलं

- पाकिस्तानच्या प्रकारचा दावा पाकिस्तानी मीडियामध्ये होतोय की भारताचे जे आहे एअरपोर्ट स्टेशन सुरतगड असो किंवा भारतामधलं जे आहे आदमपूर स्टेशन असो एवढंच नाही तर नगरोट मध्ये असणारे ब्रह्मोज मिसाईलशी संबंधित असलेले, हे सुद्धा उद्ध्वस्त केल्याच्या खोट्या बातम्या पसरवल्या जातात,त्याचं जे आहे खंडन या पत्रकार परिषदेमध्ये त्या ठिकाणी केलं

एवढंच नाही तर पाकिस्तानवर हा पण आरोप केला की, वेळोवेळीचा सिव्हिल डिफेन्स किंवा कमर्शियल एरोप्लेनचा वापर करून द्रोनच्या माध्यमातून भारतावर कशाप्रकारे कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतोय, लाहोर बेसवर एअर स्पेस बंद न करता, त्याने ज्या प्रकारे त्या ठिकाणी कमर्शियल एरलाईन सुद्धा सुरू ठेवलेल्या आहेत आणि एक प्रकारे या कमर्शियल एअरलाइन्सला शेड बनवून तो भारताविरुद्ध कुरगुडी करण्याचा प्रयत्न करतोय आंतरराष्ट्रीय मानकांचं आंतरराष्ट्रीय नियमांचं एक प्रकारे हे उल्लंघन आहे

- भारताने सगळे वेगवेगळ्या प्रकारचे प्रूफ या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिलेल्या आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या कारवाया पाकिस्तान करतोय आणि याच्याही पुढे तो आणखीन रिटालेट करेल अशा प्रकारची शक्यता आहे कारण मोठ्या प्रमाणावर पाकिस्तान आपलं सैन्य फॉरवर्ड लोकेशन कडे त्या ठिकाणी घेऊन जातंय याच्या माध्यमातून फक्त एअर फोर्सच्या माध्यमातूनच एक युकॅब व्हेईकल्स किंवा वेगळ्या प्रकारचे फायटर जेट्स किंवा मिसाईल माध्यमातून पाकिस्तान भारतामध्ये कुरकुडी करत नाहीये. तर याच्या पुढे जाऊन पाकिस्तान आता आपले जे पायदळ जे आहेत आपले जे सैनिक आहेत पायदळ जे आहेत ते सुद्धा फॉरवर्ड लोकेशन कडे त्या ठिकाणी घेऊन जाते यामधून स्पष्ट होतंय की पाकिस्तान येणाऱ्या काळामध्ये सुद्धा युद्ध खोरीची ॲक्शन त्याठिकाणी करणारच आहे आणि - भारत त्याला जशास तसे उत्तर देण्यासाठी आपला बचाव पण करतय आणि पाकिस्तान मध्ये महत्वाच्या फॉरवर्ड पोस्ट या उध्वस्त करण्यामध्ये भारताच्या सेनेला यश मिळालेल्या एकूणच हा मुकाबला सुरू आहे

- पाकिस्तान आंतरराष्ट्रीय मानकांचे त्या ठिकाणी उल्लंघन करतोय सिविलियन ला शिल्ड करून एअरलाइन्सला करून अशा प्रकारचे एअर इंटूजेंट करण्याचा प्रयत्न करतोय पण भारताची एअर डिफेन्स सिस्टम जी आहे मजबूत आहे आणि सोबतीलाच भारत पाकिस्तानच्या हद्दीमध्ये जाऊन त्यांचे स्ट्रॅटेजिक एअरबेस  उद्ध्वस्त करतोय आणि त्या माध्यमातून जे वेगवेगळ्या प्रकारची कमबॅक एअरक्राफ्ट असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कमबॅक ड्रोन असतील त्यांची उड्डाण ज्या ठिकाणाहुन होतात त्याच एअर बेसिसला न्यूट्रलाइज करण्याचा प्रयत्न करतोय


युद्ध जाहीर झाले आहे म्हणजे नक्की काय झाले आहे आणि युद्ध जाहीर कोण करते..?

- आता पर्यंत भारताने युद्ध जाहीर केलेले नाही, आणि आतापर्यंतचा इतिहास जर पाहिला तर पाकिस्तान सोबत जी जी युद्ध झाली या कुठल्याही युद्धामध्ये अधिकृतरित्या युद्धाची घोषणा त्याठिकाणी करण्यात आली होती भारता चं कन्स लक्षात घेतलं तर त्यामधलं फक्त एकच कलम नव्हती

- भारताची राज्यघटना आपण लक्षात घेतली तर, त्यामध्ये एकच कलम आहे,  आर्टिकल 352 ज्यामध्ये, एक प्रकारे राष्ट्रीय आणीबाणी कशाप्रकारे लागू करता येते, याविषयी ते कलम आहे आणि त्यामध्ये युद्ध किंवा युद्धसदृश्य परिस्थितीमध्ये अशा प्रकारची आणीबाणी लागू करता येते.

- अशा प्रकारचं मेन्शन आहे आणि जर खरोखरच अधिकृतरित्या युद्धाची घोषणा त्याठिकाणी करायची असेल, तर राष्ट्रपती ज्या सुप्रीम कमांडर ऑफ आर्मड फॉर्सच्या सरसेनापती मानल्या जातात

- आपल्या आर्मी, नेव्ही आणि  एयरफोर्सच्या त्यांच्या माध्यमातून अधिकृतरित्या ही घोषणा केली जाते, पण राष्ट्रपतीनी अशा प्रकारची घोषणा करण्याच्या आधी, आपलं केंद्र सरकार आहे त्या केंद्र सरकारच्या कॅबिनेटचं रिकमंडेशन तशा प्रकारे असावं लागतं आणि त्या आधारावरच 


राष्ट्रपती अशा प्रकारची घोषणा करू शकतात

- आत्तापर्यंतचा इतिहास पाहता कधीही अधिकृतरित्या युद्धाची घोषणा झाली नाही. 1971, 1999, 1965 असो किंवा 1962 असो या सगळ्याच कंडिशन मध्ये कधीही अधिकृत रित्या युद्धाची घोषणा त्याठिकाणी झाली नाही

पण अधिकृतरित्या युद्धाची घोषणा जरी झाली नसली तरी ज्या प्रकारची मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह हाशील करायचे आहेत, ज्या प्रकारचे एक प्रकारचा स्पेशल मिलिटरी ऑपरेशन आपण दहशतवादाचा विमा करण्यासाठी सुरू केलेला आहे. त्यासाठी कुठल्याही स्तरापर्यंत जाण्याची तयारी आपल्या आर्मड फोर्सेसची तयारी आहे, हे मागच्या तीन दिवसाच्या आपल्या अनुभवावरून आपल्याला सांगता येईल


एस्कुलेशन आणि डी एस्कुलेशन म्हणजे काय..?

- एस्कुलेशन मध्ये कशाप्रकारे जे आपले ॲडव्हर्सरी आहेत किंवा जे एनिमिनेशन आहे, कशाप्रकारे युद्ध खोरीच्या कारवाया करतोय आणि कशाप्रकारे लो इंटेन्सिटी कम्फलेकट पासून ते  मिडीयम इंटेसिटी कॉन्फल्क आणि त्याहून हाय इंटनसिटी कॉन्फ्लिक मध्ये कन्वर्ट होतं याला आपण एक्स्पिरेशन म्हणतो,

म्हणजे सुरुवातीला फक्त काही चौक्यांवर त्या ठिकाणी हल्ला केला जात असेल किंवा सुरुवातीला फक्त ड्रोन हल्ले त्या ठिकाणी केले जात असतील हा एक प्रकार आहे.

आणि हळूहळू याला वाढवत नेण्यासाठी जर तुम्ही मिलिटरी टार्गेटवर हल्ला करत असाल, सिव्हिलियन टार्गेटला त्या ठिकाणी अटॅक करत असाल, फायटर जेटचा त्याठिकाणी वापर करत असाल, तुमचं सैन्य हे आंतरराष्ट्रीय सीमा किंवा एलओसी क्रॉस करून भारतामध्ये त्या ठिकाणी येत असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टींमधून जे आहे या युद्धाचं एस्किलेशन त्या ठिकाणी होत असतं,

एस्किलेशन म्हणजे युद्ध कसं भडकतंय या या अँगलने  आपल्याला पाहता येईल आणि डी एस्किलेशन म्हणजे हा जो वाद आहे ही जी युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. हा जो संघर्ष आहे तो कसा निवळता येईल यासाठी केले गेलेले प्रयत्न,  यासाठी केलेली चर्चा यासाठी जे आहे वेगवेगळ्या माध्यमातून हे युद्धसदृश्य परिस्थिती आणि संघर्षाची परिस्थिती निवळण्यासाठी केलेला प्रयत्न म्हणजे डीएस्किलेशन आपल्याला म्हणता येईल


1971 डी एस्किलेशन कसे झाले होते

- 1971 ला डी एस्किलेशन करण्यासाठी आपल्या मिलिटरीची  ऑब्जेक्टिव्ह समजून घेतली तर,  बांगलादेश जो होता त्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये अन्याय केल्यामुळेच तिथल्या जनतेने एक प्रकारे उठाव केला होता. आणि वेस्ट पाकिस्तान म्हणजे आजचा पाकिस्तान हा जबरदस्त त्यांच्यावर दबाव करत होता.

भारत त्यांच्या ईस्ट पाकिस्तानच्या भूमिकेला जेव्हा सपोर्ट करत होता आणि म्हणून पाकिस्ताने सर्वात पहिले भारतावर हल्ला केला भारतावर हल्ला केला,  आपण त्याला रिटालिएट केलं आणि अल्टिमेटली या सगळ्या युद्धामधून बांगलादेशची निर्मिती झाली.

या सगळ्या युद्धामध्ये पाकिस्तानचे 93 हजार सैनिक भारतासमोर सरेंडर झाले. पाकिस्तान जो आहे, याच्यामध्ये पूर्णपणे हरला होता म्हणूनच एक प्रकारे मध्यस्थीमुळे पाकिस्तानला शरणागती शिवाय दुसरा कुठलाही पर्याय नव्हता,

म्हणूनच जनरल नियाजी यांनी हात वर करून 93 हजार सैनिकांनी सरेंडर केल्याचं चित्र हे सगळ्या जगासमोर त्या ठिकाणी आलं, आणि त्यानंतर 1972 च्या शिमला कराराच्या अनुसार आपण हे सैनिकही त्या ठिकाणी वापस पाठवले, आपण जो ताब्यात घेतलेला भाग होता तोही त्या ठिकाणी परत केला

आणि एकूणच या प्रकारे हे युद्ध त्या ठिकाणी निवळल, त्यावेळी युद्ध कमी करण्यासाठी कोणी विशेष प्रयत्न केले नाही, कारण भारत त्यावेळेस डॉम्युनेंट पोझिशन मध्ये होता आणि बांगलादेशची निर्मिती झाली होती


युद्ध सुरू झाले तर एखाद्या देशात कोणत्या गोष्टी बदलतात

- युद्ध जर सुरू झाले तर नक्कीच संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था यावर विपरीत परिणाम परिणाम होतो, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाशी संबंधित सुद्धा वेगवेगळ्या त्या ठिकाणच्या गोष्टी होतात आणि जर खरोखरच अधिकृतरित्या युद्धाची घोषणा केली, तर त्या ठिकाणी राष्ट्रीय आणीबाणी लागते, आणि जसा शब्द राष्ट्रीय आणीबाणी आहे. त्यानुसार एकच सर्वात महत्वाचा पर्याय किंवा एकच सर्वात महत्त्वाची गोष्ट संपूर्ण राष्ट्रासाठी, सरकारसाठी, नोकरशहा वर्गासाठी, आणि ती म्हणजे युद्ध आणि युद्धाच्या अनुषंगाने पुढे जाणं... मग त्या अनुषंगाने डिफेन्स बजेटच्या संबंधित सुद्धा ज्या आहेत वेगवेगळ्या प्रकारची प्रोव्हीजनस असतात सरकारमध्ये सुद्धा तशा प्रकारच्या गोष्टी होतात,  352 लागल्यानंतर युद्ध परिस्थिती होते.

 -तुमचा जर प्रश्न असा असेल की नेमकं युद्धामुळे काय होत..? तर युद्धामुळे सामान्य माणसापासून ते सरकारी व्यवस्थेपर्यंत ते नौकर शहापर्यंत या सगळ्याच बाबीवर जो आहे विपरीत परिणाम होतो आणि युद्ध हीच टॉपमोस्ट प्रयरोरीटी राहते


एस्किलेशन, डी एस्किलेशन सारख्या युद्धात कोणत्या संज्ञा असतात

- मागच्या दोन तीन दिवसात वेगवेगळ्या टर्म्स त्या ठिकाणी आल्या, जशा आजच्याच पत्रकार परिषदेमध्ये, युक्याब म्हणजे अनम्यांनड कंबार्ट व्हेईकल म्हणजेच मानव रहित अशा प्रकारचे जे ड्रोन आहेत, त्याला आर्मड वेपन लावलेले आहेत, म्हणजे त्यामध्ये शस्त्रास्त्र आहेत अशा प्रकारची युकॅब असू शकतात,

- किंवा जे चर्चेमध्ये आलंय यूएबी  आणि अशा प्रकारचे ड्रोन त्या ठिकाणी असू शकतात. त्याच्या पलीकडे लॉंग रेंज वेपन जस नावामध्येच त्या ठिकाणी आहे की, अशा प्रकारच्या शस्त्रास्त्राच्या माध्यमातून दूरच्या पल्या वर सुद्धा फायरिंग त्याठिकाणी करता येते, म्हणजेच पाकिस्तानला आपल्या हद्दीमध्ये राहून भारताच्या हद्दीमध्ये अशा प्रकारच्या गोळीबार किंवा अशा प्रकारची शेलिंग त्या ठिकाणी करता येते.

- अशा प्रकारचे लॉन्ग रेंज वेपन सुद्धा असतात मुळातच वेगवेगळ्या प्रकारच्या अशा भरपूर टर्म्स या ऑपरेशनल प्लॅनिंग शी संबंधित आणि मिलिटरी ऑपरेशनशी संबंधित असतात

- पाकिस्तान खोट बोलण्यात नेहमीच पटाईत आहे, पाकिस्तान मीडिया मध्ये एक बातमी चालत आहे की, भारताने पाकिस्तानवर हल्ला केला आणि ही भारताची क्षेपणास्त्र टारगेट चुकली आणि ती अफगाणिस्तानमध्ये जाऊन पडली, हे पूर्ण चुकीचे आहे. आणि अफगाणिस्तान मधील लोकांना माहीत आहे त्यांचा शत्रू कोण आहे आणि मित्र कोण आहे.



लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली