दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट व अवकाळी पाऊस झाला. त्यात जळगाव जिल्ह्यातील काही तालुक्याच्याही सहभाग आहे. चोपडा तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील काढणीला आलेली केळी जमिनीवर आडवी पडली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्याचबरोबर मकाचे देखील नुकसान झालं असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे.
सदर नुकसानग्रस्त भागाची पाहणी पालकमंत्री, स्थानिक आमदार, जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार शासकीय प्रशासकीय यंत्रणांनी केली आहे. पंचनामाचे प्राथमिक अहवाल आले असता, चोपडा तालुक्यातील ५४ गावातील १५३६ शेतकऱ्यांचे ६६३ हेक्टर वरील केळीचे नुकसान झाले आहे. पपईचे ४०.९० हेक्टर वरील नुकसान झाले आहे. मकाचे १६७.३० हेक्टर वर नुकसान झाले आहे. असे १५३६ शेतकऱ्यांचे ९१७.८५ हेक्टरवरील नुकसान झाले आहे. पंचनाम्याचे काम सुरू आहे. येणाऱ्या दोन दिवसात अंतिम पंचनामे पूर्ण होतील, असे प्रभारी तालुका कृषी अधिकारी आर. एम. पाटील यांनी सांगितले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली