दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना न्याय देण्याचे काम केले आहे - राजेश मोरे
काश्मीर मध्ये पाकिस्तानी अतिरेक्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्यात डोंबिवलीतील तीन निरपराध मृत्युमुखी पडले होते. अतिरेकींनी आमच्या महिला भगिनींनी कपाळाचं कुंकू पुसण्याचे काम केलं.
आज मी मनापासून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे अभिनंदन करतो. त्यांनी अतिरेकी हल्ल्यात शहीद झाले त्यांना न्याय देण्याचे काम केले आहे. पाकिस्तानातील अतिरेक्यांच्या अड्ड्यांवर हल्ले करून त्यांचा खात्मा केलाय. आमच्या महिला भगिनींच्या कुंकवाचा टिळा पुसला त्यांला न्याय देण्याचे काम केले आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली