लदाख मध्ये माझे दीर आणि राजस्थान मध्ये माझे पती सध्या कार्यरत आहे. आम्ही सर्व त्यांच्या फोनची वाट पाहतो आहे, एका सैनिकाची पत्नी होणे सोप नसतं- कोमल गायकवाड

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

लदाख मध्ये माझे दीर आणि राजस्थान मध्ये माझे पती सध्या कार्यरत आहे. आम्ही सर्व त्यांच्या फोनची वाट पाहतो आहे, एका सैनिकाची पत्नी होणे सोप नसतं- कोमल गायकवाड

LOKSANDESH  NEWS 



 


 लदाख मध्ये माझे दीर आणि राजस्थान मध्ये माझे पती सध्या कार्यरत आहे. आम्ही सर्व त्यांच्या फोनची वाट पाहतो आहे, एका सैनिकाची पत्नी होणे सोप नसतं- कोमल गायकवाड 

मी सैनिकाची पत्नी, सून, बहीण आणि वाहिनी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. माझ्या घरातील सात व्यक्ती लढत आहे, गावातील हजारो व्यक्ती सीमेवर लढत आहेत. लदाख मध्ये माझे दीर आणि राजस्थान मध्ये माझे पती सध्या कार्यरत आहे. आम्ही सर्व त्यांच्या फोनची वाट पाहतो आहे, एका सैनिकाची पत्नी होणे सोपे नसल्याचे मत कोमल गायकवाड यांनी व्यक्त केले.  

पालकमंत्री शिरसाट यांनी भारतीय सैनिकांच्या सन्मानासाठी, तिरंग्याच्या मानासाठी, भारतीय सैनिकांना सलाम करण्यासाठी पक्षभेद, जातीभेद बाजूला ठेवून सर्व भारतीय एकत्र येऊ या, मी येतोय तुम्ही ही या असे आवाहन शनिवारी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत . क्रांतीचौकात शहरातील हजारो देशप्रेमी कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी खासदार संदीपान भुमरे, खासदार भागवत कराड, खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार प्रदीप जैस्वाल, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त प्रवीण पवारआदींसह सर्व पक्षाचे राजकीय पदाधिकारी, अधिकारी, शहिद जवानांचे कुटुंबिय, माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

यावेळी बोलताना कराड म्हणाल्या कि, आपल्या मिसाईलने त्यांची शहरे उध्वस्त केली, मात्र त्यांची मिसाईल हवेतच आपण नस्ट केल्या, हा नवीन भारत आहे. आम्ही सर्व भारतीय सैन्याच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहोत हे दाखवण्यासाठी आपण इथे जमल्याचे कराड म्हणाल्या. देशाचा वीरांना नमन, त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आपण एकत्र आल्याचे खासदार डॉ. काळे म्हणाले. शहिद झालेल्या सैन्यातील वीरांच्या कुटुंबाना धीर देण्यासाठी हा कार्यक्रम आहे. या काळात रक्त तुटवडा जाणवू नये यासाठी सर्वांनी रक्तदान करावे असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. शहराची सुरक्षितता राखण्यासाठी उपाय योजना आपण करत आहोत, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी केले. 

हातात तिरंगी झेंडा आणि वंदे मातरम, जय जवान जय किसान, सून बेटा पाकिस्तान बार तेरा हिंदुस्थान, भारत माता की जय च्या घोषणांनी क्रांतीचौक परीसर दणाणला होता. तिरंगामय वातावरणात देशभक्तीपर गितांच्या सादरीकरण झाले. यावेळी शहिद जवानांना वंदन करण्यात आले. भारतीय सैन्याच्या शूर जवानांना पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली.



लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली.