LOKSANDESH NEWS
अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे बांधावर जाऊन पंचनामे करा - भास्कर आबा दानवे
मे महिन्यामध्ये मागील 22 दिवसापासून जालना जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलेले आहे. वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या फळबागांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे.
या नुकसान भरपाईची जिल्हाधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी इ. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी करून पंचनामे करावे, व तात्काळ त्याचा अहवाल शासनाला पाठवावा. जेणे करून शेतकऱ्यांना नुकसाणीचा मावेजा मिळेल अशी तरतुद करावी. अशी मागणी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.