भारतीय लष्कराची कारवाही देशासाठी अभिमानाची गोष्ट- डॉ विजयकुमार गावित
जम्मू कश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आज खरंतर बदला घेण्यात आला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवला आहे की भारतात कोणतीही गोष्ट खपवून घेणार नाही तुम्ही ज्या पद्धतीने दहशतवादी कारवाया करत आहेत त्यांना उध्वस्त करण्याचं काम भारत नक्कीच करेल. भारतीय सैन्य दलांनी आज पाकिस्तानात घुसून तिथले दहशतवादी कॅम्प उध्वस्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेतृत्व केलेल्या ही कारवाई देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
यापुढे जर पाकिस्तानच्या कुरापती सुरू राहिल्या तर भारत त्याला त्याच पद्धतीने उत्तर देईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला यापुढे देखील भारत याच पद्धतीने कारवाई करणार असल्याचं मत माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी व्यक्त केला आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा विरोधात भारतीय सेनेने रात्री चोख प्रत्युत्तर पाकिस्तानला दिले आहे. पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर भारतीय सेनेने हल्ला करून उध्वस्त केले. ही भारतासाठी गर्वाची बाब असून भारतीय सेनेवर नेहमीच गर्व असून आज अभिमान असल्याची बाब भारतीय सैनिक कार्यरत असलेल्या माजी सैनिकांनी तसेच नंदुरबार शहरातील नागरिकांनी आपल्या प्रतिक्रियेत व्यक्त केल्या आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली