पावसाळ्यात रेल्वे स्थानकावर कोणत्याही असुविधा होणार नसल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटाला दिले आश्वासन

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

पावसाळ्यात रेल्वे स्थानकावर कोणत्याही असुविधा होणार नसल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटाला दिले आश्वासन

                                                       LOKSANDESH  NEWS 


 


 पावसाळ्यात रेल्वे स्थानकावर कोणत्याही असुविधा होणार नसल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटाला दिले आश्वासन


चार वर्षापासून बाकी असलेला लोक ग्रामचा एफओबीचे काम पूर्ण करु, त्याच काम जून पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. लोकग्रामबची बुकींग रुम सुरु करु. महिलांकरीता शौचालयाची आणि पार्किंगची व्यवस्था करु, पावसाळ्यात रेल्वे मार्गात वॉटर लोगिग होणार नाही यासाठी तातडीने नालेसफाईचे काम केली जाईल. कल्याण पश्चिमेतील रिक्षा चालकांची व्यवस्था करु. प्रवाशांना चांगली सुविधा मिळेल. फेरीवाल्यांचा बंदोबस्त स्थानिक पोलिस, केडीएमसी यांच्या माध्यमातून करु. स्कायवाक वरील गर्दूल्यांचे अड्डे उद्धवस्त करु असे आश्वासन रेल्वे प्रशासनाने शिवसेना ठाकरे गटाला दिले असल्याची माहिती जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांनी दिली आहे. 

कल्याण रेल्वे स्थानकातील कार्यालयात यासंदर्भात आज बैठक पार पडली. या बैठकी पश्चात जिल्हाप्रमुख बोडारे यांनी ही माहिती दिली आहे. रेल्वे समस्यांबाबत २ मे ला रेल्वे प्रशासनाला  शिवसेना ठाकरे गटाने निवेदन दिले होते. समस्या सोडविण्यात याव्यात. अन्यथा आम्ही रेल रोको करु अशा इशारा रेल्वे प्रशासनाला दिला होता. परंतू रेल्वे प्रशासनाने ती वेळ न येऊ देता. एडीएमआरने पाठवून आमच्या सोबत आज कल्याण रेल्वे स्थानकातील कार्यालयात चर्चा केली असल्याचे जिल्हा प्रमुख बोडारे यांनी सांगितले. कल्याण मध्ये बैठक पार पडली यावेळी जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे कल्याण पूर्व शहर प्रमुख शरद पाटील कल्याण पश्चिम शहर प्रमुख बाळा परब  शिवसेना ठाकरे पदाधिकारी रुपेश भोईर, शिवसेना ठाकरे गट महिला पदाधिकारी आशा रसाळ, युवा मोर्चाचे पदाधिकारी नीरज कुमार आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. 



लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली