चोपड्यात वातावरण बदलामुळे लिंबूचे दर घसरले

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

चोपड्यात वातावरण बदलामुळे लिंबूचे दर घसरले

LOKSANDESH  NEWS 



                                             चोपड्यात वातावरण बदलामुळे लिंबूचे दर घसरले 


- एप्रिल मे महिन्यामध्ये उन्हाचा पारा जसजसा वाढतो त्या प्रमाणात लिंबूची मागणी देखील वाढत असते. लिंबूची मागणी वाढली तर भाव देखील वाढतात. गेल्या महिन्यात लिंबू 170 तर 180 रुपये किलोने मिळत होता.  परंतु गेल्या आठवड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्याने वातावरणात बदल झाल्याने लिंबू च्या मागणीमध्ये फरक पडला त्याचबरोबर गेल्या सात आठ दिवसापासून या परिसरातील लाईट नसल्याने लिंबू बागेला पाणी देता येत नाही पाणी नसल्याने लिंबूचे बागा सुकू लागले आहे. 

झाडांवरील लिंबूची क्वालिटी खराब होत आहे असे अनेक समस्यांना तोंड देत असताना सध्या लिंबूला 45 ते 50 रुपये किलोने भाव मिळत आहे रोजचे 15 मजूर लिंबू तोडण्यासाठी लागत आहे वादळी वाऱ्यामुळे व लाईट नसल्याने पाणी देता येत नसल्याने लिंबूच्या झाडावर लागलेल्या लहान लहान लिंबू गळून जात असल्याने जून जुलै मध्ये येणारा जो बहार आहे तो आता येणार नाही त्यामुळे त्याच्या फटका शेतकऱ्याला बसणार असल्याचं खंत शेतकरी व्यक्त करताना दिसत आहे. 


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली