ऑन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घ्यायच्या ठरविले आहे. या पार्श्वभूमीवर हा सिंधुदुर्ग दौरा आहे.
ऑन शक्तिपीठ महामार्ग खासदार नारायण राणे वक्तव्य- नारायण राणे कधी कोणाला विश्वासात घेऊन काही करत नाहीत. येथील रिफायनरी प्रश्न किंवा पुरंदर विमानतळ प्रश्न असेल, शक्तिपीठ महामार्ग असेल किंवा अजून काही असेल! ज्या लोकांसाठी आम्ही काम करतोय असे सरकार म्हणतेय, पण अशा लोकांचे प्रश्न सरकारने कधी विचारात घेतले नाहीत. तुम्ही ज्यांचा विकास करायचा असे म्हणतात आणि त्यांचाच विरोध आहे, मग विकास कोणाचा करीत आहात.
काही जण भांडवलदार व्यवस्थेचे रखवालदार आहेत. ज्यांनी आधीच चिंचोक्याच्या भावात जमिनी विकल्या आहेत, त्यांना त्या जमिनीचे ५० पट भाव अगदी व्हाईट मनी मध्ये सरकार दरबारी मिळवून द्यायचे असतील तर ही राजकीय नेत्यांची गरज आहे. कारण निवडणूक काळात ज्यांना ज्यांना पैसे दिले आहेत, ना त्यांचा परतावा देण्यासाठी असे प्रोजेक्ट केले आहेत. राणे जे बोलतात त्यांच्या विरुद्ध असा प्रश्न काढायचा की ते पूर्व म्हणाले तर आपण पश्चिम म्हणायचे.
ऑन आमदार दीपक केसरकर- केसरकर यांना हे तरी माहीत आहे का? की आपला मतदारसंघ कुठून सुरू होतो. केसरकर मंत्री होण्यासाठी इतके वेडावले होते की, त्यांचे ते वेड त्यांनी मतदारसंघातील कनेक्टिविटी तोडली होती. ही कनेक्टिविटी तुटल्यामुळे त्यांची वरती सरकार बरोबरील कनेक्टिविटी तुटली आहे. केसरकर यांना हे मागून सुचलेले शहाणपण आहे.
ऑन राजकोट येथील शिवरायांचा पुतळा- शिवरायांची प्रतिमा मनामनात आणि घराघरात आहे. आमच्या धमण्यांमध्ये शिवरायांचा वसा आणि वारसा आहे. त्यासाठी तुम्ही शिवरायांचा पुतळा किती उंच करीत आहात याला महत्व नाही. त्यांच्याबाबत ती आदर भावना असली पाहिजे. अन्यथा पहिल्या पुतळ्याचा अवमान कसा झाला ? ज्यांनी केला त्या आपटेला तुम्ही काय शिक्षा दिली? हे तुम्ही आधी सांगितले असते. फडणवीस यांची हिम्मत असेल तर कोल्हटकर आणि आपटे यांचे काय करणार ते त्यांनी सांगावे.
ऑन भारत-पाक युद्ध- युद्ध कोणालाच हवे नसते. ही अतिशय अपरिहार्य आपत्ती आहे. ज्या राजकीय पक्षांच्या लोकांना फार उन्माद साजरा करायचा असे वाटते, ते अत्यंत वाईट आहे. कुणाचा मुलगा जातोय, कुणाचे कुंकू फुसले जातेय, त्यांना काय वाटत असेल? पण सीमेवर जवान धारातीर्थी पडत असताना गलिच्छ राजकारण होतेय हे वाईट !
ऑन उद्धव-राज एकत्र- उद्धव आणि राज हे दोघे भाऊ आहेत. कुटुंब म्हणून त्यांनी कायम एकत्र आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली