LOKSANDESH NEWS
गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान
गोंदिया जिल्ह्यात मागील पाच-सहा दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा जोर कायम असून, यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी मेहनतीने पेरलेले मक्का, आंबा, आणि धान पीक वादळ आणि पावसामुळे अक्षरशः जमीनदोस्त झाले आहे.
या नैसर्गिक आपत्तीत लाखो रुपयांचे पीक नुकसान झाले असून, अनेकांच्या घरांचे छप्पर देखील उडाले आहे. शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा नैसर्गिक संकट ओढवले असून, सध्या ते मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शासनाने तातडीने पंचनामे करून योग्य तो आर्थिक मदतीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली