On राहुल गांधी माफीनामा (ऑपरेशन ब्लु)
- देर आहे दुरुस्त आहे, शीख बांधवांच्या हत्या करून बेघर करण्यात आलं होतं. हे पाप जे काँग्रेसने केलं. राहुल गांधींनी त्याबद्दल माफी मागितली. ही माफी त्याचवेळेस मागितली असती तर बरं झालं असतं. राहुल गांधी म्हणतात त्यावेळेस राजकारणात होते. माहित नव्हतं मात्र ज्यावेळेस खासदार झाले त्यावेळीच त्यांनी माफी मागितली असती तर ते स्वागतहार्य असते. काँग्रेसचा अस्तित्व संपत असल्यामुळे नाराज असून पक्षातील कार्यकर्ते काम करायला तयार नसल्यामुळे ते आता पडत्या काळात माफी मागत आहे. ही माफी राजकीय पोळी शेकून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत आहे.
On प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न
- राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष सातत्याने मलीन झालेली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. पण देशाची बदनामी करून राहुल गांधी यांना फायदा होणार नाही. राहुल गांधी यांचे वक्तव्य पाहता त्यांना देशातच पप्पू म्हणायचे आता देशभरभर पप्पू म्हणून संबोधितात असे आहे.
On जरांगे मुंबई हाक
- जातीय जनतेमुळे कोणाची किती संख्या हे स्पष्ट होईल. त्यामुळे जरांगे पाटलांनी आता घाई न करता शांत रहावं. जातीनिहाय जनगणने झाल्यावर मराठा समाज 32 टक्के आहे की किती टक्के आहे हे स्पष्ट होईल. त्यानंतर आरक्षण असो की सोयी सुविधा कोणत्या द्यायचा, कोणत्या योजना आणल्या पाहिजे हे स्पष्ट होईल.
On सपकाळ - भाजप चेटकीण वक्तव्य
- स्वतःचं घर जे सांभाळू शकत नाही, हर्षवर्धन सपकाळ प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून या प्रकारचे स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करतात. पक्षातील लोक त्यांना स्वीकारत नसल्यामुळे "पॅराशुट" नेता म्हणून ते महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष झाले आहे. लादले गेले नेते असल्यानं स्वतःचं अस्तित्व तयार करण्यासाठी अशा पद्धतीचे वक्तव्य करून लॅम लाईट मध्ये राहण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.