हल्ला होऊन दहा दिवस लोटले, नुसता गडगडाटच, गरजेंगे वो बरसेंगे क्या -माजी आमदार अनिल गोटे यांची टीका
जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर आठवडा उलटूनही केंद्र सरकारकडून ठोस कारवाई झाली नाही. आमचा नुसता गडगडाटच, गरजेंगे या बससँगे क्या? असा सवाल माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. 'तुम्ही वेळ आणि ठिकाण ठरवा ही तीन दलप्रमुखांना दिलेली मोकळीक म्हणजे देशवासीयांची फसवणूक आहे, असा आरोप शिवसेना नेते व माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे.
इंदिरा गांधी यांनी कोणतीही वल्गना न करता निर्णायक पावले उचलली होती. पण आजचं नेतृत्व केवळ जाहिरातबाजी आणि श्रेयासाठी प्रसिद्ध आहे. देशभरात वृत्तपत्रे आणि वाहिन्या अजूनही फक्त सरकारचे समर्थन करता आहेत. १४० कोटी जनतेची ही सरळसरळ फसवणूक आहे. असा आरोप अनिल गोटे यांनी केला आहे. राज्य सरकारने हौतात्म्य पत्करलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना दिलेली आर्थिक मदत ही अपुरी आहे. अशा घटनांनंतर राजकीय टीका न करता निर्णायक कृती झाली पाहिजे, असे माजी आमदार अनिल गोटे यांनी म्हटले आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली