अवकाळी पावसामुळे शेती मशागतीची कामे थांबली; खरीप पेरणी लांबणार
मागील पंधरा दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस सतत कोसळत आहेत. यामुळे मे महिन्यात होणारी शेती मशागतीची कामे पूर्णपणे रेंगाळली आहेत. घाटाखालील बहुतांश तालुक्यात 50 मिलिमीटर पेक्षा जास्त अवकाळी पाऊस कोसळला असल्याने शेती ही ओलीचिंब झालेली आहे.
याशिवाय दररोज कुठे ना कुठे वीज कोसळून जीवितहानी होण्याचेही घटना समोर येत असल्याने शेती मशागतीच्या कामांचा खोळंबा झाला आहे. तर काही ठिकाणी शेती मशागतीची कामे झालेली होती त्या शेतकऱ्यांना आता पुन्हा मशागतीची कामे करावी लागणार आहे. यामुळे शेगाव जळगाव जामोद, संग्रामपूर खामगाव, मलकापूर आणि नांदुरा या तालुक्यांमध्ये जून महिन्या च्या सुरुवातीला होणाऱ्या पेरण्या लांबणीवर पडणार आहेत.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.