स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत कोल्हापुरात महाविकास आघाडी एकत्र लढणार - आमदार सतेज पाटील

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत कोल्हापुरात महाविकास आघाडी एकत्र लढणार - आमदार सतेज पाटील


 स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत कोल्हापुरात महाविकास आघाडी एकत्र लढणार - आमदार सतेज पाटील


ON गिरीश महाजन वक्तव्य (निवडणूका लांबणीवर)

- सुप्रीम कोर्टात ओबीसी संदर्भात निर्णय झाला आहे

- शिवाय काही कारणास्तव निवडणूकांसाठी मुदतवाढ देण्यासंदर्भात संकेत दिला आहे

- महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती सर्वजणांना माहिती आहे

- त्यामुळे एकावेळी महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूका निवडणूक आयोग घेवू शकतो का? याबाबत  साक्षंकता आहे 

- सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर शासनाची याबाबतीत काय भूमिका असणार आहे, हे स्पष्ट करावं

- शासनाने सर्व पक्षांना बोलावून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकांविषयी चर्चा करावी

- सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्याने, आता शासनाला कुठल्याही कारणास्तव निवडणूका पुढे ढकलणं शक्य होणार नाही

- सत्ता आल्यापासून महायुतीचा कारभार वाईट सुरू आहे. त्यामुळे जनमत मिळेल का नाही? याची महायुतीला शंका आहे

- मात्र सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार महायुतीला निवडणूका घ्याव्याच लागतील


ON दोन्ही राष्ट्रवादी एकत्र

- शरद पवार साहेब इंडिया आघाडीचे प्रमुख नेते आहेत

- इंडिया आघाडीच्या स्थापनेवेळी प्रमुख वाटा शरद पवारांचा राहिलेला आहे

- त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील यामध्ये तथ्य वाटत नाही

- शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादीच चिन्ह जाण्यापर्यंतचा लढा सुप्रीम कोर्टात दिलेला आहे

- राज्यात महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्षांनी आतापर्यंत एकत्रीत काम केलं आहे. आणि यापुढेही यामध्ये कुठलीही अडचण येईल, असं वाटत नाही

- कार्यक्रमात आम्ही सर्वजण एकत्र असतो

- सहकाराचा कार्यक्रम आणि राजकीय कार्यक्रम याचा संबंध जोडणं संयुक्तिक राहणार नाही


ON विजय वड्डेटीवार वक्तव्य (भारत -पाक युद्ध)

- भारत - पाकिस्तान युध्द जन्य परिस्थितीवर चर्चा होणं आवश्यक आहे

- याबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून सांगितले आहे

- केंद्र सरकारची भूमिका संसदेच्या माध्यमातून देशासमोर आली पाहिजे

- कारण सीजफायरची घोषणा दुर्दैवाने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी जाहीर केली

- सीजफायरची घोषणा भारताच्या पंतप्रधानांनी जाहीर करणं अपेक्षित होतं

- काँग्रेस पक्षाने पहिल्यापासून पाकिस्तानवर कारवाई झाली पाहिजे, त्यासाठी काँग्रेस पक्ष सरकारच्या पाठीशी असल्याच स्पष्ट केलं आहे

- त्यामुळे याची चर्चा करण्यासाठी अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे 


ON अलमट्टी उंची विरोध

- अलमट्टी धरणाची उंची वाढल्याने कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीनही जिल्ह्यांना मोठा फटका बसणार आहे

- लवादाने जरी निर्णय दिला असला तरी, अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत केंद्र सरकारने नोटिफिकेशन काढू नये

- शिवाय महाराष्ट्र सरकारने याबाबतीत कडक भूमिका घ्यावी 

- तेलंगणा सरकार सुप्रीम कोर्टात गेलं आहे, त्याठिकाणी पार्टी होवून हे हाणून पाडण्याच काम करावं

- अलमट्टीच्या उंची विरोधात १८ तारखेला चक्काजाम आंदोलन सर्वपक्षीय आहे

- महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्राच्या हिताची भूमिका घ्यावी

- लाडक्या बहिणीच 2100 रुपये कुठे गेले याचं सरकारने उत्तर द्याव

- स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत कोल्हापुरात शक्य होईल, तिथे महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार

  

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली.