पावसाळ्यापूर्वी प्रत्येक ग्रामपंचायतीवर वीज रोधक यंत्र बसवावे, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आपत्ती व्यवस्थापनाची बैठक

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

पावसाळ्यापूर्वी प्रत्येक ग्रामपंचायतीवर वीज रोधक यंत्र बसवावे, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आपत्ती व्यवस्थापनाची बैठक

LOKSANDESH  NEWS 




पावसाळ्यापूर्वी प्रत्येक ग्रामपंचायतीवर वीज रोधक यंत्र बसवावे, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आपत्ती व्यवस्थापनाची बैठक


   पावसाळा जवळ येऊन ठेपला आहे. यापूर्वी या महिन्यात अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी घरासह, पिकांचे अत्यंत नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, यासह कृषी,आरोग्य, महसूल यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागाकडून आपत्ती व्यवस्थापना संदर्भात आढावा घेतला. 

   पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांवर सर्व विभागांनी तयारी ठेवावी. समस्या निर्माण झाल्यास कश्या प्रकारे लवकर मदत पोहचेल यावर लक्ष द्यावे. आरोग्य वीज व आपत्ती विभाग यानी मोठ्या प्रमाणात तयारी ठेवावी, परिस्थिती उदभवल्यास उपायोजना करण्याच्या सूचना दिल्यात. तसेच मागील वर्षी वीज पडल्यामुळे तीन जणांना आपला जीव गमवावा लागला होता यामुळे जीवित हानी होऊ नये यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीवर अथवा प्रशस्त इमारतींवर वीज विरोधक यंत्र लावण्याच्या सूचना जिल्हाधिकारी केल्यात. ज्यामुळे वीज पडून कोणतीही हानी होणार नाही. पावसाळा पूर्वीच सर्व विभागांनी सतर्क राहावे असे जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी सांगितले.



लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.