बोरिवली पडघा सह अनेक गावातील जन्म मृत्यू नोंदीची किरीट सोमय्यांकडून तपासणी

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

बोरिवली पडघा सह अनेक गावातील जन्म मृत्यू नोंदीची किरीट सोमय्यांकडून तपासणी



 बोरिवली पडघा सह अनेक गावातील जन्म मृत्यू नोंदीची किरीट सोमय्यांकडून तपासणी


 संपूर्ण महाराष्ट्रातील संशयास्पद जन्म मृत्यू नोंदणी बाबत भाजपा नेते किरीट सोमय्या हे महाराष्ट्रातील विविध पालिका कार्यालय, तहसीलदार कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी भेटी देऊन कागदपत्रांची पडताळणी करीत आहेत. गुरुवारी मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या भिवंडी तालुक्यातील बोरीवली व पडघा ग्रामपंचायत कार्यालयास भेट देऊन तेथील जन्म मृत्यू नोंद कागदपत्रांची पडताळणी केली आहे. त्यासोबतच वाडा तालुक्यातील कुडूस, वडवली व भिवंडी तालुक्यातील अंबाडी या गावांना सुद्धा भेटी दिल्या आहेत. बोरीले येथील एटीएम च्या कारवाईनंतर हा भेटीचा दौरा असल्याने पोलिसांनी या वेळेस चोख असा बंदोबस्त ठेवला होता.

   महाराष्ट्रात जन्म मृत्यू नोंदी मध्ये फार मोठा घोटाळा झाला आहे. मागील चार महिने याबाबत शोध घेत आहे. २०२४ मध्ये राज्यात २ लाख लोकांनी खोटे कागदपत्र देऊन जन्म नोंदी साठी अर्ज केले. त्या सर्वांच्या नोंदी तपासण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. पडघा परिसरातील अर्धा डझन गावांसंदर्भात काही संशयास्पद जन्म नोंदी केल्याची मला माहिती मिळाली आहे. मालेगाव येथे तर १०४४ अशा पद्धतीने जन्म प्रमाणपत्र घेतले आहे. त्यातील २१७ गायब आहेत. आंतरिक सुरक्षा धोक्यात येत आहे. जन्म प्रमाणपत्र घेतले की लगेच दुसऱ्या दिवशी पासपोर्ट साठी अर्ज, चौथ्या दिवशी लगेच पासपोर्ट मिळाले की परदेशात रवाना होत आहेत. काही अशी गाव आहेत तेथे प्रत्यक्ष जाऊन मी स्वतः चौकशी करणार. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने चौकशी सुरू असेल तर त्याबाबत बोलण उचित होणार नाही असे शेवटी किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले आहे. 



लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.