बकरी ईदच्या दिवशी मंदिर खुले ठेवण्याची परवानगी द्या, शिंदे-ठाकरे गट व हिंदू संघटनांची संयुक्त मागणी
कल्याण येथील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर दरवर्षी बकरी ईदच्या दिवशी नमाज पठणावेळी मंदिरात आरती आणि घंटानादाला बंदी घालण्यात येते. याच्या विरोधात 1986 पासून धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून "घंटानाद आंदोलन" सुरू करण्यात आले होते. मात्र, शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गट स्वतंत्रपणे हे आंदोलन करीत होते. मात्र, यंदा या पार्श्वभूमीवर कल्याण परिमंडळ ३ चे डीसीपी अतुल झेंडे यांनी दोन्ही गटांच्या प्रतिनिधींना व हिंदू संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावले.
या बैठकीत ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी व शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर एकत्र उपस्थित होते. या बैठकीनंतर आमदार भोईर म्हणाले की, “गेल्या ३५ वर्षांपासून आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या आदेशानुसार आंदोलन करत आहोत. मुस्लिम बांधव नमाज पठण करत असतानाच मंदिरात आरती करण्याची आमची परंपरा आहे. त्यामुळे या वर्षीही मंदिर खुले ठेवण्याची परवानगी मिळावी, ही आमची मागणी असल्याचे विश्वनाथ भोईर यांनी सांगितले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.