पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे कैरी उत्पादक शेतकरी अडचणीत
गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे कैरी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यंदा धुळे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लोणच्यासाठी लागणाऱ्या कैऱ्यांची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. तसेच ज्या चांगल्या कैऱ्या आहेत त्यांची या पावसामुळे क्वालिटी खराब झालेली आहे. त्यामुळे ग्राहक यंदा कैरीकडे पाठ फिरवत आहे. दरवर्षी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच कैरी घेण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू असते. यंदा मात्र मान्सून पूर्व झालेल्या पावसामुळे कैऱ्यांची कॉलिटी देखील खराब झाली आहे आणि आवक देखील कमी झालेली आहे. ज्या कैरीचा भाव हा 20 ते 25 रुपये किलो होतात तो जर भाव आता वाढला असून, 40 ते 45 रुपये किलो प्रमाणे कैऱ्यांची विक्री आता होत असल्याची माहिती आडत दुकानदार हरीश माळी यांनी यावेळी दिली.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.