भिवंडी शहरामध्ये सांडपाण्याचे चेंबर आणि कचऱ्यामुळे नागरिक हैराण
- भिवंडी प्रभाग क्रमांक 4 अंतर्गत येणाऱ्या वॉर्ड नंबर 20 मधील शिवाजी नगर, अंजुरफाटा परिसरात सध्या स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे. या भागात गटारांचे झाकण उघडे पडले असून, रस्त्यावर सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या भागात दुर्गंधी पसरली असून, मोकळ्या गटारांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. लहान मुले आणि वृद्ध नागरिकांना ये-जा करताना विशेष त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक रहिवाशांनी वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे लवकरात लवकर पालिकेने लक्ष देऊन कचऱ्याची सफाई करावी आणि उघडे चेंबर त्वरित झाकावेत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आहे.