विविध मागण्यांसाठी केडीएमसी मुख्यालयासमोर बेमुदत उपोषण

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

विविध मागण्यांसाठी केडीएमसी मुख्यालयासमोर बेमुदत उपोषण



विविध मागण्यांसाठी केडीएमसी मुख्यालयासमोर बेमुदत उपोषण


विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दलाचे जिल्हा प्रमुख राजाभाऊ बेळेनवरु यांनी आजपासून कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. त्यांच्यासोबत अतिक शेख, सलाम शेख, सागर पाहाडी आदी महिला कार्यकर्त्याही उपोषणाला बसल्या आहेत.

    जिल्हाध्यक्ष बेळेनवरु यांनी सांगितले की, दलित आदीवासी आणि आर्थिक दृष्ट्या यांचे वन जमीनीवर पूनर्वसन करणे असा कायदा आहे. आमच्या वस्तीमध्ये गटारे, पाणी, राहण्यासाठी मोफत घरे उपलब्ध करुन देण्यात आलेली नाहीत. कल्याण पूर्वेतील कचोरे परिसरातील माता रमाबाई नगरात आर्थिक दृष्ट्या मागास आणि दलित नागरिकांची वस्ती आहे. दलित नागरी वस्ती सुधारणे अंतर्गत आम्हाला कोणत्याही नागरी सोयी सुविधा महापालिकेकडून उपलब्ध करुन दिल्या जात नाही. सरकारने दिलेला अधिकार आणि उपलब्ध करुन दिलेल्या निधीचा आमच्या विकासासाठी काही एक उपयोग होत नाही, सोयी नाही. त्यात एका रस्ते विकास प्रकल्पात आमची घरे बाधित होत आहेत. आम्हाला पर्यायी घरे दिली जावीत अशी आमची मागणी आहे. त्याचबरोबर महापालिका हद्दीतील फेरीवाल्यांच्या हरकती सूचनांची दखल घेतली गेली नाही. त्यांना व्यवसाय करण्यासाठी महापालिकेने जागा उपलब्ध करुन द्यावी, असा उच्च न्यायालयाचा आदेश आहे. त्याची अंमलबजावणी महापालिका प्रशासनाकडून केली जात नसल्याचा आरोप बेळेनवरु यांनी केला आहे. जोपर्यंत आमचे प्रश्न सोडविले जात नाही. तोपर्यंत हे बेमुदत उपोषण सुरुच राहणार असल्याचा इशारा बेळेनवरु यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.