मुस्लिमांनी इको फ्रेंडली बकरी ईद करावी हा माझा चांगला सल्ला आहे - नितेश राणे

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

मुस्लिमांनी इको फ्रेंडली बकरी ईद करावी हा माझा चांगला सल्ला आहे - नितेश राणे

 


  मुस्लिमांनी इको फ्रेंडली बकरी ईद करावी हा माझा चांगला सल्ला आहे - नितेश राणे 

ऑन ठाकरे गट/मनसे युती

- दोन्ही भावांनी काय करावं, हा त्यांचा कौटुंबिक विषय आहे, ते सोबत आले काय आणि नाही आले काय, कोणाचेही कुटुंबीय एकत्रित येत असेल, वाद मिटत असेल, तर चांगली गोष्ट आह. त्यामध्ये आम्ही विचार करणे, दखल घेणे, दुखी होण्याची गोष्ट नाही. ठाकरे कुटुंब म्हणून ते एकत्रित येत असेल, तर चांगली गोष्ट आहे. मात्र ज्यांनी त्यावेळेस ठाकरे कुटुंब तोडले, तेच आता एकत्र येण्याची गोष्ट करत आहे. जेव्हा राज ठाकरेंनी शिवसेना सोडली, तेव्हा संजय राऊत याची गाडी जाळण्यात आली होती. तेव्हा अनेक लोक शकूनी मामाच्या भूमिकेत होते. आणि आता तेच लोक दोन्ही भावांनी एकत्रित आले पाहिजे असे लेक्चर देत बसले आहे

ऑन बकरी ईद

- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना बडगुजर भेटले, (प्रवेशाचा) अधिकृत निर्णय झालाय असं काही माहिती नाही. ते जे काही निर्णय घेतील त्यानंतर प्रतिक्रिया देणे योग्य होईल. मात्र बडगुजर ची हकालपट्टी झाली आहे, हे मी ऐकले आहे. जेव्हा निर्णय येईल, तेव्हा आपण बोलू

On प्यारे खान नोटीस धमकी 

- जबाबदार पदावर बसलेल्या व्यक्तीने जबाबदारीने भूमिका बजावली पाहिजे असं मी मानतो. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष म्हणून तुम्ही मुस्लिम आणि अल्पसंख्याक समाजाला एकत्रित कसे करू शकता त्यांचे प्रबोधन कसा करू शकता, यावर भूमिका मांडली पाहिजे. आता प्यारे खान यांची जी भूमिका आहे, ती इस्लामला बदनाम करणारी आहे. जेव्हा इको फ्रेंडली होळी, इको फ्रेंडली दिवाळी, फटाके मुक्त दिवाळी असे असंख्य सल्ले हिंदू समाजाला दिले जातात. तेव्हा हिंदू समाज समजून घेतो. आम्ही दुसऱ्या धर्माला नावे ठेवत बसत नाही. हिंदू समाज आपला धाक दाखवत नाही. तसाच विचार मुस्लिमांनी करावा अशी माझी भूमिका व सल्ला आहे. जसं हिंदू समाज पर्यावरणवाद्यांचा ऐकतो आणि फटाके वाजवत नाही, रंग खेळत नाही, मुस्लिमांनी इको फ्रेंडली बकरी ईद करावी हा माझा चांगला सल्ला आहे, यामध्ये हिंदू मुस्लिम वाद निर्माण करण्याचा प्रश्न कुठे आहे

बकरी ईद मुळे हिंदू नागरिक अस्वस्थ आहे, कारण त्यांच्या सोसायटीमध्ये बकरे कापले जाणार, त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होणार आणि दोन्ही समाजामध्ये वाद निर्माण होणार. उद्या यामुळे दंगली पण होऊ शकतात. हे थांबवण्यासाठी जर कोणी सल्ले देत असेल तर ऐकले पाहिजे. हिंदू समाजाला सल्ले दिले जाते, तेव्हा हिंदू समाज आक्रोश दाखवतो का? जोरजबरदस्ती करतो का? मग अबू आजमी कसं बोलतो, हम तो बकरा काटेंगे. यावरूनच हिंदू समाजाचा समजूतदारपणा दिसून येतो. त्यामुळे कोण इस्लामला बदनाम करत आहे आणि कोण फडणवीस यांची बदनामी करत आहे हे महाराष्ट्राला कळतय. प्यारे खान यांना मी सल्ला देतो त्यांनी मी काय बोललो याबद्दल विचार करावा आणि त्यांनीच मुस्लिम समाजाला आव्हान करायला पाहिजे की नितेश राणे जे बोलत आहे ते आपल्या हिताचे आहे. त्याप्रमाणे आपण इको फ्रेंडली बकरी ईद साजरी करू

- दोन समाजात तेढ निर्माण झाली तर अशांतता निर्माण होऊ शकते. तसं आम्ही असताना दंगली होण्याचा कारण नाही. महाराष्ट्र शांत ठेवायचा असेल तर इको फ्रेंडली बकरी ईद हा पर्याय आहे

On आदित्य ठाकरे 

- (हिंदीत बोलले) आदित्य ठाकरे यांनी आपला आडनाव ठाकरे बदलून घेतल पाहिजे आणि आदित्य खान आणि आदित्य शेख केला पाहिजे, तेव्हा ते जास्त शोभून दिसेल बाळासाहेबांचा नातू जर अशा पद्धतीने बोलणार असेल, तर तो ठाकरे आडनाव वापरण्याच्या लायकीचा नाही

On मासेमारी

- छोटे तलाव मधील मासेमारी कंत्राटवर स्टे लागू आहे. मोठ्या तलावाबद्दलचा स्टे उचलला आहे, त्यामुळे तिथे मासेमारीच्या कंत्राटसाठी स्पर्धा होईल. आणि मासेमारांचा फायदा होईल. भारताच मासेमारी चा उत्पादन 

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.