अवकाळीच्या पावसाच्या विश्रांतीनंतर मशागतीच्या कामांना वेग
येवला तालुक्यात अवकाळी पावसाने विश्रांती दिल्यानंतर आता तालुक्यात सर्वत्र खरीप हंगामासाठी शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग आला असून अनेक शेतकरी ट्रॅक्टर तसेच बैलांच्या साह्याने आपल्या जमिनीची योग्य पद्धतीने तयार करत आहेत. खरीप हंगामासाठी शेतकरी आता सज्ज झाले आहे. याच मशागतीच्या कामांना सध्या तालुक्यात वेग आला आहेत. आठ जून रोजी मृग नक्षत्र लागणार असून या काळात जर पुरेसा आणि योग्य पाऊस झाला तर खरीप पेरणी सुरुवात देखील होणार आहे. यामुळे बहुसंख्य शेतकरी आता मशागतीनंतर पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.