Loksandesh News

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

No title

  कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात कचऱ्याचे साम्राज्य



कLल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमधील परिसरात सध्या कचऱ्याचे आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून, त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मुख्य बाजारपेठ आणि फुल मार्केट परिसरात कचऱ्याचे ढिगारे दिसत असून, अनेक दिवसांपासून हा कचरा न उचलल्याने या ठिकाणी फुले कुजलेली व सडलेली दिसून येत आहेत. परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या दुर्गंधीयुक्त कचऱ्यामुळे परिसरात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना नाकावर रुमाल लावून फिरण्याची वेळ आली असून, बाजारपेठ समितीकडून तातडीने स्वच्छतेची उपाययोजना न झाल्यास साथीचे रोग पसरण्याची भीती व्येक्त होत आहे. लहान मुले, वृद्ध आणि महिलांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. 0यामुळे हा कचरा लवकरात लवकर उचलावा अशी मागणी बाजार समिती मधले अनेक व्यापारी वर्ग करत आहे.